क्राईम

…त्यावेळी शाहरुख खान सोबत चॅटींग केले; समीर वानखेडेंची न्यायालयात माहिती; अटकेपासून तात्पूरता दिलासा

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात सीबीआयने एनसीबी मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला असून ते अडचणीत आहेत. वानखेडे यांनी या प्रकरणात आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी दाखल केलेल्या रिट याचीकेत आर्यन खान कोठडीमध्ये असताना आपले शाहरुख खान याच्यासोबत मॅसेजवरुन बोलणे झाल्याची माहिती दिली आहे. दरम्यान आजच्या सुनावणीत वानखेडे यांना तात्पुरता दिलासा मिळाला असून 22 मे पर्यंत त्यांना अटक करु नये असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

शाहरुख खान याच्यासोबत जे बोलणे झाले त्याचे तपशील वानखेडे यांनी याचिकेसोबत जोडले आहेत. त्यामुळे या प्रकरणात आता पुढे अनेक गोष्टी समोर येण्याची चिन्हे आहेत. वानखेडे यांच्या विरोधात जे आरोप केले आहेत, ते सर्व आरोप समीर वानखेडे यांनी या याचिकेतून नाकारले आहेत. माझ्यावर याआधी देखील भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, त्यावेळी मुंबई पोलिसांनी माझी चौकशी केली असता कोणतेही पुरावे सापडले नसल्याचे वानखेडे यांनी म्हटले आहे.

सीबीआयने जो भ्रष्ट्राचाराचा गुन्हा दाखल केला आहे, त्यामध्ये देखील माझ्याविरोधात काही सापडणार नाही असा दावा देखील त्यांनी केला असून आर्यन खान ड्रग्जप्रकरणातील भ्रष्टाचारासंदर्भातील कारवाई सुडाच्या भावनेतून केली जात असल्याचा आरोप वानखेडे यांनी केला आहे. या प्रकरणी याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी वानखेडे यांनी केली होती. ती मागणी मुंबई उच्च न्यायालयाने मान्य केली.
हे सुद्धा वाचा

समीर वानखेडे यांचा आरोप; मागास समाजातील असल्याने ज्ञानेश्वर सिंग यांनी माझा छळ केला

गोरी नव्हते म्हणून रिजेक्ट केले; चिंत्रांगदा सिंहचा मोठा गौप्यस्फोट

पंतप्रधान मोदी करणार नव्या संसद भवनाचे 28 मे रोजी लोकार्पण

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडे यांनी 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असून सीबीआयने वानखेडे यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत तातडीने सुनावणीची मागणी केली होती. त्यावर आज उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या वेळी वानखेडे यांनी अनेक खुलासे केले आहेत. आजच्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने वानखेडे यांनी तात्पुरता दिलासा दिला असून 22 मे पर्यंत वानखेडे यांना अटक करु नये असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

 

 

प्रदीप माळी

Recent Posts

मनपा करसंकलन विभाग जाहिरात करात दहा टक्के वाढ

मनपा करसंकलन (Municipal Tax) विभाग जाहिरात करात दहा टक्के वाढ करणार असून आचारसंहितेनंतर हा प्रस्ताव…

12 hours ago

विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला सत्र, उच्च व सर्वोच्च अशा न्यायालयांच्या तिन्ही पातळ्यांवर…

12 hours ago

काँग्रेसचा दहशतवाद्यांना निर्दोषत्वाचे सर्टिफिकेट देण्याचा घातक खेळ; पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबईवरील दहशतवादी हल्ला पाकिस्ताननेच घडविला हे संपूर्ण जग जाणते, खुद्द पाकिस्ताननेही याचा इन्कार केलेला नाही,…

16 hours ago

स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांना पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन पुरस्कार जाहीर

अयोध्या येथील श्रीरामजन्म भूमी न्यासाचे खजिनदार आणि जगभरात गीतेचा प्रसार करणारे स्वामी गोविंददेवगिरी महाराज (Swami…

16 hours ago

अरविंद केजरीवाल तुरूंगातून बाहेर येतील, नरेंद्र मोदींचा कार्यक्रम करतील

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. (Arvind Kejriwal has…

17 hours ago

नाशिक शहरात ऐन उन्हाळ्यात महामार्ग बस स्टॅन्डचे बांधकाम

फेब्रुवारी महिन्यात राज्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बस स्टॅन्डचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले.…

17 hours ago