टीम लय भारी
औरंगाबाद : औरंगाबादमधील सातारा परिसरातील एमआयटीजवळ बहिण-भावाची निघृण हत्या करण्यात आली (Aurangabad Sister and Brother Murder) आहे. या दोघांचे मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत बाथरुममध्ये आढळले ही घटना काल (9 जून) रात्रीच्या दरम्यान उघडकीस आली. बहिण-भावाच्या निघृण हत्येने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या विषय अधिक माहिती अशी की, सातारा परिसर, एमआयटी जवळील अल्फाईन हॉस्पिटलजवळ राहणारे लालचंद राजपुत हे शेतीच्या कामानिमित्त परिवारासह जालना येथे मंगळवारी गेले होते. घरात त्यांची मोठी मुलगी किरण लालचंद राजपुत (19) आणि तिचा भाऊ सौरभ राजपुत (17) हे दोघे घरात होते. रात्रीच्या सुमारास लालचंद राजपुत हे घरी परतले. त्यांनी वाहनाचा हॉर्न वाजवला. हॉर्न वाजवून घरातून प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी वाहन उभे करून घराची पाहणी केली. यावेळी त्यांना बाथरूममध्ये दोघा बहिण-भावाचे मृतदहे आढळले. दोघांचे गळे चिरून हत्या करण्यात आली होती. आरडाओरड केल्याने परिसरातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच उपायुक्त डॉ. राहुल खाडे, पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. “हत्या दुपारच्या दरम्यान झाली असून रात्री उघडकीस आली. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याlत आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.