टीम लय भारी
मुंबई : सोशल मीडियात धुमाकूळ घालणाऱ्या ट्रोलर्सनी ‘जितेंद्र आव्हाड तुझा नरेंद्र दाभोळकर होणार’ ( AwhadVsBJP ) अशी उघड धमकी दिली आहे. धक्कादायक म्हणजे, ही धमकी कालच्या मारहाण प्रकरणाच्या अगोदरच दिली आहे. मारहाण झाल्यानंतर आता आव्हाड यांच्या मुलीवर बलात्कार करण्याचीही ताजी धमकी देण्यात आली आहे.
आव्हाडांचा दाभोळकर करण्याची धमकी कैलासराणा गणेश सुर्यवंशी याने फेसबुकवर दिली आहे. तर आव्हाड यांच्या नावानेच खोटे अकाऊंट उघडून त्यांच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी अज्ञाताने दिली आहे.
नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या सनातनी हिंदुत्ववाद्यांनी केली होती. या दोन्ही दिवंगत मान्यवरांनी फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारधारेला अनुरूप सामाजिक कार्य केले. शिवरायांचा खरा इतिहास लोकांसमोर आणला होता. अंधश्रद्धेत जखडलेल्या अठरा पगड जातीच्या लोकांना शहाणे करण्यासाठी दाभोलकरांनी आयुष्य वेचले.
लोकांना शहाणे करणे, धर्मभोळेपणा – अंधश्रद्धेला कडाडून विरोध करणे असे कार्य दाभोलकर व पानसरे यांनी केले होते. दाभोलकर व पानसरे यांचे कार्य काही धर्मांध हिंदुत्ववाद्यांना पचनी पडले नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील या दोन मान्यवरांची हत्या सनातन्यांनी केली होती.
जितेंद्र आव्हाड ( AwhadVsBJP ) हे सुद्धा दाभोलकर यांच्याप्रमाणेच हिंदु धर्मातील भंपकपणावर सतत टीका करीत असतात. शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार सांगत असतात. दाभोलकर व पानसरे यांचे विचार सनातन्यांना पटले नव्हते. आव्हाडांचेही ( AwhadVsBJP ) विचार आता सनातन्यांना खटकू लागले आहेत. त्यामुळे दाभोळकर यांच्या प्रमाणेच आव्हाडांचीही ( AwhadVsBJP ) हत्या करण्याचा कट शिजवला जातोय की काय अशी शंका या फेसबुक पोस्टमुळे निर्माण झाली आहे.
शाहु, फुले, आंबेडकरांची भूमिका मांडणाऱ्या सामाजिक – राजकीय कार्यकर्त्यांना धर्मांध सनातनी सोशल मीडियावर गलिच्छ शब्दांत ट्रोल करीत असतात. भाजप सरकारच्या ( AwhadVsBJP ) कार्यकाळात तर या विकृतांनी कहरच माजवला आहे. अशा स्थितीत पोलीस यंत्रणा मात्र काहीच कारवाई करीत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विकृत धर्मांधाना आवर घालण्यासाठी पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारण्याची गरज असल्याच्या भावना आता जनमाणसांमधून व्यक्त होऊ लागल्या आहेत.
आणखी बातम्यांसाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा
राज्यात कोरोनाबाधित 150 नवीन रुग्णांची आज नोंद झाली.यामुळे राज्यातील रुग्ण संख्या 1018 झाली आहे.यामध्ये मुंबई 116,पुणे 18,अहमदनगर 3,बुलढाणा 2,ठाणे 2,नागपूर 3,सातारा 1,औरंगाबाद 3,रत्नागिरी 1, सांगली 01असा तपशील आहे.आतापर्यंत 79 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 7, 2020
हे सुद्धा वाचा
AwhadVsBJP : ‘ज्याला मारलं, तो यापूर्वीच गजाआड हवा होता’
Dr. Ambedkar : डॉ. आंबेडकर जयंतीचा ‘इव्हेन्ट’ करू नका; विरोधक आपल्या बदनामीसाठी टपलेत’
Dr. Ambedkar : डॉ. आंबेडकर जयंतीचा ‘इव्हेन्ट’ करू नका; विरोधक आपल्या बदनामीसाठी टपलेत’