टीम लय भारी
मुंबई : यंदा विठ्ठल – रखूमाईच्या महापुजेचा मान देवेंद्र फडणवीस यांनाच मिळेल, असे स्वप्न भाजप कार्यकर्त्यांना पडले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे भाजप कार्यकत्यांचा स्वप्नभंग होईल अशी चिन्हे दिसत आहे.
महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. पुढील सुनावणी येत्या ११ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील पंधरवडाभर महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती ‘जैसे थे’ राहणार आहे. तोपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खूर्चीला कोणताही धोका असणार नाही.
येत्या १० जुलै रोजी एकादशी आहे. त्या दिवशी मुख्यमंत्रीपदावरील व्यक्तीला सपत्नीक विठ्ठल रखूमाईच्या महापुजेचा मान मिळतो. महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता निर्माण झाल्याने यंदाच्या महापुजेचा मान उद्धव ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाणार असा जोरदार प्रचार भाजप कार्यकर्त्यांनी केला होता. पण न्यायालयाने नेमका १० जुलैपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या सरकारला दिलासा आहे. १० जुलैला उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे विठ्ठलाची पुजा करतील, व दुसऱ्या दिवशी ११ जुलैला न्यायालयात सुनावणी होईल.
हे सुद्धा वाचा :
संजय राऊतांचे तोंड बंद करण्यासाठी विरोधकांनी ‘ईडी’ला केले पुढे
नियमाप्रमाणे महापालिका हद्दीतील एखाद्या इमारतीचे ३० वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान झाल्यास स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे आहे.…
गुन्हेगारी टोळीतील आठ आरोपींना बंदुकीने फायर करणे महागात पडले. या आरोपींना माेक्का (MCOCA) लावण्यात आला…
भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले…
याअंतर्गत स्वीप उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत नवीन नाशिक विभागात महिला बचत…
पालघर मधून एक धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आलीये. स्त्रियांवर आणि बालकांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ…
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सपाटून मार खाल्ला होता. अशातच अजितदादांच्या मागं…