गेल्या आठ जून पासून सुरू झालेले मृग नक्षत्र कोरडे गेल्याने राज्यात चिंतेचे ढग निर्माण झाले असून शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. काही भागात ऊन तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण दिसत आहे. वातावरणात सातत्याने बदल होत आहे.या दिवसांत मशागत पूर्ण होऊन पेरणीची तयारी सुरु होत होती. मात्र पाऊस लांबल्याने मशागतही लांबली आणि पेरण्याही खोळबल्या आहेत. शेतकरी राजा चिंताग्रस्त झाला आहे. राज्यात पुढच्या ३ दिवसांमध्ये मान्सून दाखल होईल असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
21 Jun: @RMC_Mumbai & @imdnagpur ने 23 जूनपासून कोकणातील काही भागात, मध्य महाराष्ट्र व विदर्भात ; 24-25 जूनपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे.
मराठवाडा मधील काही भागात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता.
IMD GFS guidance for 23 -25 June indicates same. pic.twitter.com/ZzbS3WRNjI— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 21, 2023
मुंबईत 23 जूनला मध्यम स्वरुपाचा पाऊस असणार आहे. तर 24 व 25 जूनला मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.कोकणात अकरा जून रोजी दाखल झालेल्या मोसमी पाऊस पुढच्या वाटचालीसाठी पोषक आहे. हे वारे हळूहळू वाटचाल करत आहे, असे हवामान विभागाचे महासंचालक होसाळीकर यांनी सांगितले आहे. मराठवाडामध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज आहे. पाऊस लांबल्याने खरीप हंगाम अडचणीत आला आहे. काही भागात धूळवाफ पेरण्या झाल्या आहेत.
हे सुध्दा वाचा:
आव्हानाला सामोरे जाणे तुमचं-माझं कर्तव्यच नाही तर धर्म आहे; शरद पवारांनी फुंकले रणशिंग
इतकेच नाहीतर सातारा, सांगली, बीड , सोलापूर, लातूर, नांदेड, नाशिक, अहमदनगर, जालना या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. तर अमरावती, गडचिरोली, यवतमाळ, चंद्रपूर या ठिकाणी तीव्र उष्णता नागरिकांना सहन करावा लागणार आहे.