लय भारी न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : अयोध्येमधील वादग्रस्त जमिनीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य आहे. या निर्णयामुळे बऱ्याच वर्षांपासून रखडलेला मुद्दा एकदाचा निकाली निघाला आहे. त्यामुळे राम मंदिराच्या मुद्द्यावरून आता राजकारण थांबेल अशा शब्दांत काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी भाजपला टोला लगावला.
श्रीराम हा सर्व धर्माचा आदर करणारा होता. जनतेचे कल्याण, शांतता, सदभावनेचे प्रतीक राम आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निकाल सर्व संस्था, संघटना, व्यक्ती यांना मान्य आहे. सर्वोच्च न्यायालय जो काही निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल अशी काँग्रेसने नेहमीच भूमिका घेतली होती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचे आम्ही स्वागत करतो, अशी भावनाही सुरजेवाला यांनी व्यक्त केली.