लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि उपनगरांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. आज, शनिवार सकाळी ११ वाजल्यापासून मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू कण्यात आले आहे.
मुंबईसह उपनगरांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या जमावबंदी आदेशानुसार, एका जागी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. सकाळी ११ वाजल्यापासून हा जमावबंदी आदेश लागू होईल. शहरात विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. धार्मिक स्थळांसह धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असलेल्या संवेदनशील ठिकाणांवर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून पोलिसांनी सोशल नेटवर्किंग साइट्सवर करडी नजर ठेवली आहे. कुणीही अफवा पसरवण्यात येऊ नयेत, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.