लय भारी न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आम्हाला मान्य आहे. न्यायालयाने ज्या ठिकाणी मंदीर बांधण्यास परवानगी दिली आहे, तिथे मंदीर बांधण्यास आमची हरकत नाही. न्यायालयाने मशीद बांधण्यासाठी जी जागा दिली आहे, त्या ठिकाणी उत्कृष्ट मशीद बांधावी, अशी भावना मुस्लिम समाजातील धर्मगुरूंनी व्यक्त केली आहे.
देशाचे संविधान, कायदा व न्यायालय सर्वोच्च आहे. त्यामुळे देशातील जनतेने, प्रत्येक नागरिकाने न्यायालयाच्या या निकालाचा आदर करावा. आम्ही भारताचे नागरिक आहोत. भारतात सगळेजण गुण्या गोविंदाने नांदत असतात. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाचा प्रत्येक नागरिकाने आदर करावा, असे आवाहनही या मुस्लिम धर्मगुरूंनी केले आहे.