महाराष्ट्र

Maharashtra Rain : महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा हाहाकार

राज्यात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. ज्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. तसेच यामुळे राज्यातील अनेक लोकांना आणि प्राणिमात्रांना देखील आपला जीव गमवावा लागला असल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत राज्याच्या अनेक भागामध्ये अतिवृष्टी देखील झालेली आहे. या अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात आतापर्यंत ३५० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर पाच हजार पेक्षा अधिक जनावरे दगावल्याची माहिती समोर आली आहे. यंदाच्या वर्षी आतापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. तसेच पुढील काही दिवस आता राज्यात पाऊस पडणार नसल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

यंदाच्या वर्षी राज्यामध्ये सुरुवातीला पावसाने विश्रांती घेतलेली पाहायला मिळाली. जून महिन्याच्या सुरुवातीला हवा तसा पाऊस न पडल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला होता. परंतु त्यानंतर मात्र राज्यात पावसाने चांगलाच जोर धरला. तर राज्यातील काही भागात जोरदार अतिवृष्टी देखील झाली. पण आता गेल्या काही दिवसामध्ये परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान केले आहे.

परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची राज्य सरकारने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसात नांदेड, परभणी या भागात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. ज्यामुळे सोयाबीन आणि ज्वारीच्या पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या शेतात गुडगाभर पाणी साचल्याने शेतकऱ्यांना ऐन दिवाळीमध्ये निराशा हाती आली.

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिवाळीनिमित्त तरुणांना दिली खुशखबर

Thane Crime : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शहरात हत्येच्या घटनांनी उडाली खळबळ

Lay Bhari Diwali Magzine : ‘लय भारी’चा दिवाळी अंक राजकारण्यांसाठी ‘अभ्यास पुस्तक’, मुख्यमंत्र्यांनी दिवाळी अंकाचे केले प्रकाशन

दरम्यान, आता पावसामुळे झालेल्या या नुकसानामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आता तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन कमीत कमी त्यांची दिवाळी गोड करा, अशी मागणी देखील केली आहे.

यंदा झालेल्या या अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक रस्त्यांची देखील दुरावस्था झालेली आहे. ज्यामुळे राज्यातील अनेक भागांमधून खड्डयांमुळे अपघात वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी, परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतीसह इतर अनेक गोष्टींचे देखील अतोनात नुकसान झाले आहे. दरम्यान, आता पुढील काही दिवसात राज्यात पाऊस पडणार नसल्याची माहिती राज्यातील हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

तुषार खरात

Recent Posts

शहरातील जीर्ण वाड्याबाबत मनपा उदासीन; नागरिक धोक्यात

नियमाप्रमाणे महापालिका हद्दीतील एखाद्या इमारतीचे ३० वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान झाल्यास स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे आहे.…

1 hour ago

सिडको गोळीबार प्रकरणातील ८ जणांवर मोक्का

गुन्हेगारी टोळीतील आठ आरोपींना बंदुकीने फायर करणे महागात पडले. या आरोपींना  माेक्का (MCOCA) लावण्यात आला…

2 hours ago

कर्नाटकातील अत्याचार हा नारीशक्तीचा अपमान;काँग्रेस प्रवक्ता प्रगती अहिर यांची भाजपावर टीका

भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले…

2 hours ago

सिडको विभागात सायकल रॅलीसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली.

याअंतर्गत स्वीप उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत नवीन नाशिक विभागात महिला बचत…

2 hours ago

पोटच्या मुलीलाच देहविक्रीस भाग पाडून तिच्या जन्मदात्यांनी विकलं

पालघर मधून एक धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आलीये. स्त्रियांवर आणि बालकांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ…

5 hours ago

अश्रू, तुझा खरा रंग कंचा ? रोहित पवारांचा की अजित पवारांचा ??

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सपाटून मार खाल्ला होता. अशातच अजितदादांच्या मागं…

5 hours ago