महाराष्ट्रात पावसाळा सुरू झाला की रस्त्यांच्या कामाला अनेक ठिकाणी सुरुवात झाल्याचे अनेकदा पाहायला मिळत असते. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याचेही अनेकदा ऐकायला येत असते. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी तर थेट रोडच्या रोड कामासाठी बंद केलेले दिसून येतात. असाच काहीसा प्रकार सध्या ठाण्यात सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाण्यापासून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक रस्त्यांवर लोखंडी गर्डर टाकण्याचे काम सुरू झाल्याने पुढील चार दिवस वाहतुकीवर परिणाम होणार आहे. वाहतूक अहवालानुसार, ठाणे शहरातील आनंदनगर सिग्नल ते हायपरसिटी मॉल, वाघबील पूल, घोडबंदर रोडपर्यंत लोखंडी गर्डर टाकण्याचे काम 13 ते 16 ऑक्टोबर दरम्यान करण्यात येणार आहे. गर्डर टाकण्याचे काम पाहता ठाण्यातील घोडबंदर रोडची जलवाहिनी वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. अशा परिस्थितीत प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून या मार्गांवरून जाणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे यावेळी प्रशासनाकडून या कामासाठी रस्ता बंद केला असल्याची सूचना दिली आहे.याशिवाय प्रशासनाकडून प्रवाशांसाठी पर्यायी मार्गांची यादी देखील प्रसारित केली आहे. त्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या अडचणी थोड्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
हे सुद्धा वाचा
Eknath Shinde : शिंदेंच्या हातून ढाल-तलवार निसटणार? शीख समाजाने घेतला चिन्हावर आक्षेप
हे आहेत पर्यायी मार्ग
नव्या ट्रॅफिक ऍडव्हायझरीनुसार, मुंबई ठाण्याहून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी अवजड वाहने कापूरबावडी वाहतूक शाखेजवळ उजवीकडे वळण घेऊन खारेगाव टोल नाका, माणकोली, अंजूरफाटा मार्गे असं त्यांच्या योग्य मार्गी जातील. तसेच ठाण्याकडून घोडबंदर रोडकडे जाणारी अवजड वाहने कापूरबावडी जंक्शनजवळ उजवीकडे वळण घेऊन कशेळी, अंजूरफाटा मार्गे त्यांच्या इच्छित स्थळी जातील.
त्याचबरोबर मुंब्रा, कळवा येथून घोडबंदर रोडकडे जाणारी सर्व अवजड वाहने खारेगाव टोलनाक्यावर वळविण्यात येत आहेत. मार्ग बंद झाल्यामुळे खारेगाव टोल नाका, माणकोली, अंजूरफाटा खारेगाव खडी पुलाखालून गॅमन मार्गे तुम्हाला तुमच्या इच्छित स्थळी जाता येणार आहे.
नाशिकहून घोडबंदरला जाण्यासाठीचा मार्ग
नाशिकहून घोडबंदर रोडकडे जाणाऱ्या सर्व अवजड वाहनांसाठी माणकोली नाका बंद आहे. या वेळी नाशिककडून घोडबंदर रोडकडे जाणारी सर्व वाहने माणकोली पुलाखालून उजवीकडे वळून अंजूरफाटा मार्गे जातील.
मनपा करसंकलन (Municipal Tax) विभाग जाहिरात करात दहा टक्के वाढ करणार असून आचारसंहितेनंतर हा प्रस्ताव…
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला सत्र, उच्च व सर्वोच्च अशा न्यायालयांच्या तिन्ही पातळ्यांवर…
मुंबईवरील दहशतवादी हल्ला पाकिस्ताननेच घडविला हे संपूर्ण जग जाणते, खुद्द पाकिस्ताननेही याचा इन्कार केलेला नाही,…
अयोध्या येथील श्रीरामजन्म भूमी न्यासाचे खजिनदार आणि जगभरात गीतेचा प्रसार करणारे स्वामी गोविंददेवगिरी महाराज (Swami…
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. (Arvind Kejriwal has…
फेब्रुवारी महिन्यात राज्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बस स्टॅन्डचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले.…