टीम लय भारी
मुंबई : ‘येडझवे मोदीला विरोध करू शकत नाही म्हणून सीएए / एनआरसीच्या आडून कितीही फंडींग करा मोदी सोडा एकटा मोटाभाई सगळ्याच्या गांडीत खुट्टा सारीन’ अशा अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये मनोज साळुंखे नावाच्या अंधभक्ताने फेसबुकवर मुक्ताफळे उधळली आहेत.
संगिता पाटील नावाच्या अन्य एका भक्ताने तर कहरच केला आहे. पाटील यांनी अनुल्लेखाने महात्मा गांधीजी यांची बदनामी केली आहे, तर खूनी नथूराम गोडसे याचे समर्थन केले आहे. ‘तोडा जिसने देश मेरा बिना फावडा बिना कुदाल. अंग्रेझो के दलाल को गोडसेने कर दिया हलाल’ असा अत्यंत संतापजनक मजकूर पाटील यांनी फेसबुकवर लिहिला आहे. संगिता पाटील यांच्या या मजकुरातून महात्मा गांधी यांची इंग्रजांचे दलाल अशी अनुल्लेखाने संभावना केली आहे. संगिता पाटील तेवढ्यावरच थांबलेल्या नाहीत. त्यांनी ‘हलाल’ हा अत्यंत भयानक शब्द वापरला आहे. हलाल म्हणजे, बोकड किंवा बकरीच्या नरडीवर सुरा ठेवून त्याचा गळा कापणे असा अर्थ सामान्य मराठी लोकांना माहित आहे. ‘महात्मा गांधीजी इंग्रजांचे दलाल होते, आणि नथूराम गोडसेने महात्मा गांधीजींना हलाल केले’ असा संदेश संगिता पाटील यांना आपल्या मजकूरातून द्यायचा असल्याचे दिसते.
वास्तवात, १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यात महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू व त्यांच्या देशभक्त अनुयायांचा मोठा वाटा आहे. स्वातंत्र्य मिळण्याअगोदर पाच वर्षांपूर्वी म्हणजे, १९४२ मध्ये महात्मा गांधी यांनी पुकारलेल्या चले जाव आंदोलनाने स्वातंत्र्य मिळण्याची परिस्थिती निर्माण केली. या आंदोलनामुळे संपूर्ण देशवासियांच्या भावनांचा कडेलोट झाला होता. दुसऱ्या महायुद्धातून होरपळलेल्या ब्रिटीशांमध्ये संतापलेल्या भारतीयांचे आंदोलन चिरडून टाकण्याचे त्राण उरले नव्हते. त्यामुळे भारताला स्वातंत्र्य देण्याची मानसिकता ब्रिटिशांची झाली, आणि पुढच्या अवघ्या पाच वर्षांत ब्रिटीशांनी देशाला स्वातंत्र्य दिले. याचे पूर्ण श्रेय महात्मा गांधी व पंडीत नेहरू यांच्या लढ्याला जाते. आजही जगामध्ये महात्मा गांधी आणि पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्यामुळेच भारताला ओळखले जाते. महात्मा गांधी यांनी अहिंसेची शिकवण दिली होती, आणि संपूर्ण जगाला या शिकवणीबद्दल प्रचंड आदर आहे. परंतु नथूराम गोडसे या हिंदू अतिरेक्याने महात्मा गांधी यांचा मर्डर केला. ही घटना आजही सच्चा देशवासियांच्या हृदयाला वेदना देत असते. असे असताना संगिता पाटील यांनी महात्मा गांधीजींची अनुल्लेखाने अतिशय वाईट शब्दांत हेटाळणी केली आहे.
संगिता पाटील या नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस व भाजपच्या कट्टर समर्थक असल्याचे त्यांच्या फेसबुक प्रोफाईलवरून दिसत आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांवर त्यांनी सतत दुगाण्या झाडल्या आहेत. भाजप व त्यांच्या नेत्यांविषयी गुणगाण गाणारा मजकूर यथेच्छ प्रमाणावर त्या फेसबुकवर नियमितपणे ओतत असतात. एखाद्या राजकीय पक्षावर सनदशीर मार्गाने टीका करणे, किंवा विशिष्ट पक्षाचे समर्थन करणे यात घटनात्मकदृष्ट्या गैर काही नाही. परंतु स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात मोठ्या नेत्याची बदनामी करणे व एका अतिरेक्याचे समर्थन करणे अतिशय संतापजनक आहे.
संगिता पाटील या कट्टर भाजप समर्थक आहेत. त्यामुळे महात्मा गांधींजींविषयी संगिता पाटील यांनी जी गरळ ओकली आहे ते भाजपचे अधिकृत धोरण आहे की काय अशी साशंकता या फेसबुकवरील मजकुरावरून वाटते. मुळात संगिता पाटील नावाचे फेसबुक प्रोफाईल खरे आहे की महात्मा गांधीजी यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांची बदनामी कऱण्यासाठी अन्य विरोधी पक्षांमार्फत ते बनावटपणे तयार केले आहे अशी शंका सकृतदर्शनी उपस्थित होत आहे.
संगिता पाटील यांनी महात्मा गांधी यांच्यावर गरळ ओकली आहे, तशीच गरळ मनोज साळुंखे या महाभागाने सीएए व एनआरसी विरोधातील आंदोलकांवर ओकली आहे. नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्या नावाचा वापर करून आंदोलकांना धमकावण्याचा प्रयत्न या साळुंखेने केला आहे. त्यासाठी आंदोलकांना ‘येडझवे’ ही उपमा दिली आहे. एवढेच नव्हे तर, मोदी सोडा, एकटा मोटाभाई (म्हणजे अमित शाह) या आंदोलकांच्या गांडीत खुट्टा सारीन’ असेही या साळुंके याने नमूद केले आहे. म्हणजे, एनआरसी / सीएए विरोधात जर कुणी काही केलेच तर त्या लोकांवर कोणत्याही सनदशीर किंवा कायदेशीर मार्गाचा अवलंब केला जाणार नाही, तर खुट्टा सारला जाईल अशी दादागिरीची भाषा वापरण्यात आली आहे. गँगस्टर दाऊद इब्राहिम, छोटा शकील अशा गुंडांनाही लाजवेल इतकी गुंडगिरीची भाषा या भक्ताने वापरली आहे.
हे सुद्धा वाचा
चंद्रकांत पाटील यांची मागणी, देवेंद्र फडणवीसांची चौकशी करा
पंकजाताई म्हणाल्या, माझ्या स्वाक्षरीमध्येही गोपीनाथ मुंडे यांचे नाव
अजितदादांना भेटण्यासाठी तुडुंब गर्दी, मंत्रालयाबाहेरही लांबलचक रांगा