राष्ट्रीय

IAS टीना डाबी यांच्यावर कारवाई होणार; विस्तापित पाकिस्तानी हिंदूंची घरे पाडल्याप्रकरणी अडचणी वाढल्या

राजस्थानमधील जैसलमेर जिल्हा मुख्यालयापासून ४ किमी दूर असलेल्या अमरसागर येथील पाकिस्तानातून विस्थापित म्हणून आलेल्या हिंदूंची घरे पाडल्याप्रकरणी जिल्हाधिकारी टिना डाबी अडचणीत सापडल्या आहेत. जैसलमेरच्या जिल्हाधिकारी टीना डाबी यांनी यांनी अतिक्रण विरोधी कारवाई करत येथील ५० हून अधिक कच्ची घरे बुलडोजर आणि जेसीबीने पाडून टाकली. या प्रकरणात आता गेहलोत सरकारमधील मंत्री प्रतापसिंह खाचरियावास यांनी प्रतिक्रीया दिली असून ही कारवाई चुकीची असल्याचे सांगत जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे सांगितले.

मंत्री खाचरियावास म्हणाले, अधिकाऱ्यांनी जे केले ते चुकीचे होते. त्याबद्दल त्यांना खुलासा करावा लागेल. आम्ही त्यांच्याविरोधात कारवाई करु. जैसलमेरमध्ये पाकिस्तानी हिंदू विस्थापित मोकळ्या जागेत राहतात. राजस्थान सरकार त्यांना कागदपत्रे देत आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वत: त्याबाबत घोषणा केली आहे. राजस्थान सरकारच्या कायद्यानुसार आपण कोणाचेही पुनर्वसन केल्याशिवाय त्यांना बेदखल करु शकत नाही. हा प्रकार अतिशय गंभीर आहे. त्यांमुळे त्या अधिकाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल. पुढे ते म्हणाले, कोणीही कलेक्टर असो, कोणीही अधिकारी असो हे गहलोत सरकारविरोधात षडयंत्र आहे. जे विनाकारण सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा अधिकाऱ्यांची जरुर चैकशी झाली पाहिजे. अधिकाऱ्यांनी पाप केले असून त्यांना त्याचे परिनाम भोगावे लागतील.

हे सुद्धा वाचा

मैत्रिणीला मिठीत घेतले, मग गोळ्या झाडून केली हत्या; स्वत:ही केली आत्महत्या

…म्हणून देवेंद्र फडणवीस म्हणाले, शरद पवारांचे कोटी कोटी आभार

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरमय्या शपथ घेणार; 2024 च्या लोकसभा निवडणुकीची रणनिती

जैसलमेरच्या जिल्हाधिकारी टीना डाबी यांच्या आदेशानुसार पाकिस्तानातून विस्तापित म्हणून आलेल्या हिंदू कुटुंबांच्या घरांवर अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली होती. त्यात 150 हून अधिकजण बेघर झाले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार विस्थापित नागरिक अमर सागर तलावाच्या किनाऱ्यावर अनधिकृतपणे घरे बांधून राहत होते. त्यामुळे तलावात पाणी येण्यास अडथळा येत होता. तर दुसरीकडे विस्थापितांनी सरकारच्या आदेशाने कारवाई झाल्याचा आरोप देखील केला आहे.

प्रदीप माळी

Recent Posts

अरविंद केजरीवाल तुरूंगातून बाहेर येतील, नरेंद्र मोदींचा कार्यक्रम करतील

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. (Arvind Kejriwal has…

38 mins ago

नाशिक शहरात ऐन उन्हाळ्यात महामार्ग बस स्टॅन्डचे बांधकाम

फेब्रुवारी महिन्यात राज्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बस स्टॅन्डचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले.…

44 mins ago

पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या वडेट्टीवार यांच्याशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का ?; देवेंद्र फडणवीस

हेमंत करकरे यांची हत्या अजमल कसाब ने केली नाही असे म्हणणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार…

1 hour ago

‘मदत फाऊंडेशन’चा कौतुकास्पद उपक्रम, पक्ष्यांकरिता शेकडो पाणवठ्यांची व्यवस्था

'मदत फाऊंडेशन’ (Help Foundation) च्यावतीने अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. पाण्याअभावी पक्ष्यांचा मृत्यू होऊ नये,…

1 hour ago

आदित्य ठाकरेंचे काम,श्रेय लाटताहेत राहुल शेवाळे !

लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पार पडले. चौथ्या आणि पाचव्या टप्प्याच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली…

1 hour ago

नरेंद्र मोदी देशभर ४०० पारच्या घोषणा देत फिरत होते, पण २०० पार होणे सुद्धा त्यांना जड जाणार आहे: रमेश चेन्निथला

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) भाजपचे प्रचारक बनून ४०० पारच्या घोषणा ('400 par' slogans) देत…

2 hours ago