टीम लय भारी
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यामध्ये सुरक्षा व्यवस्थेमध्ये हलगर्जीपणा झाला. मोदींच्या सुरक्षेतील त्रुटींमुळे भाजप आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाला आहे. पंजाब सरकार आणि राज्यातील पोलिसांवर सुरक्षेची जबाबदारी असताना असा हलगर्जीपणा कसा झाला? असा प्रश्न निर्मण झाला आहे. मोदींचा ताफा शेतकऱ्यांनी अडवला होता त्याचे व्हिडीओ आणि फोटोसुद्धा व्हायरल झाले आहेत(Nawab Malik’s question to BJP about Modi’s security breach).
यामध्ये आता आणखी एक व्हिडीओ अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पोस्ट करत भाजपवर पलटवार केला आहे. मोदींच्या ताफ्याजवळ भाजपचे कार्यकर्ते आणि समर्थक कसे पोहोचले असा सवाल नवाब मलिकांनी केला आहे.
बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताचे मुख्य कारण आले समोर
ओबीसी आरक्षणावरून नवाब मलिक यांचा इशारा!
राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पंजाबमध्ये सुरक्षेत झालेल्या त्रुटींचा आहे. मोदींचा ताफा शेतकरी आंदोलकांनी एका उड्डाणपुलावर रोखला होता. ताफा जाणूनबुजून रोखण्यात आला असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. मात्र नावब मलिक यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये भाजपचेही समर्थक तिथे घोषणाबाजी करताना दिसत आहेत. मोदींच्या ताफ्याजवळ भाजप समर्थक असल्यामुळे विरोधकांकडून आता भाजपवर निशाणा साधण्यात येत आहे.
मोदीजी, तुम्ही जे पेरले तेच उगवले : नाना पटोले
नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील हलगर्जीपणावर टीकास्त्र डागलं आहे. पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेचा कांगावा करणाऱ्या गोदी मीडिया आणि भाजपचा प्रॉपगंडा फुटला आहे. मोदींच्या ताफ्यासमोर आंदोलनकारी नसून भाजपचे कार्यकर्ते होते, या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत असल्याचे नाना पटोले यांनी ट्विट करत म्हटलं आहे.