टीम लय भारी
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बेळगावात मएच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्यावर संताप व्यक्त केला.बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्यावर बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं की, महाराष्ट्र सरकारने फक्त निषेध करून चालणार नाही, मराठी बांधव आणि एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत तुम्ही फक्त निषेधाचे खलिते पाठवतात अशा शब्दात राऊतांनी संताप व्यक्त केला(Sanjay Raut expresses anger over the attack in Belgaum)
ते म्हणाले की, महाराष्ट्र सराकरने कठोर पावले उचलावीत अजित पवारांनी निषेध व्यक्त केला. जे दोन मंत्री सीमा प्रश्नासाठी नेमले आहेत त्यांनी तात्काळ बेळगावला जाऊन मए च्या कार्यकर्त्यांशी चर्चा करायला हवी.तसंच फक्त खलिते पाठवून चालणार नाही असंही त्यांनी म्हटलं.
डान्सबारच्या गुप्त तळघरातून 17 महिलांची सुटका…
चंद्रकांत पाटील यांचे राहूल गांधींना आव्हान
याशिवाय राहुल गांधी यांनी हिंदूत्वाबद्दल केलेल्या विधानावर राऊतानी प्रतिक्रिया दिली. दिल्लीत बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, देश सगळ्यांचा जरी असला तरी बहुसंख्य हिंदुंच्या भावना डावलून राजकीय पावले टाकता येणार नाही.
याबाबत राहुल गांधींशी अनेकदा चर्चा झाली. तरी त्यांनी मी हिंदू आहे आणि काँग्रेसचा आत्माही हिंदू आहे असं म्हटलं.
भाजपाच्या १२ आमदारांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच; निलंबनाला स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार
राज्यात नागपूर विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळें यांना विजय मिळवला ही चांगलीच गोष्ट आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची परिस्थिती आणि गणित वेगळं असतं..