क्रीडा

Asia Cup 2022: जाणून घ्या कसे भारत आणि पाकिस्तानचे संघ एकदा नाहीतर दोनवेळा स्पर्धेत एकमेकांशी भिडू शकतात

भारत (India) आणि पाकिस्तानच्या (Pakistan) क्रिकेट सामन्याची प्रत्येक क्रिकेट रसिक नेहमीच आतुरतेने वाट पाहत असतो. त्यांच्यासाठी चांगली बातमी अशी आहे की, भारतीय संघ एकदा नाहीतर दोन वेळा पाकिस्तानच्या संघाशी दोन हात करू शकतो. पण त्यासाठी काही समीकरणे जुळून येणे महत्त्वाचे आहे. आपण हया लेखात हे जाणून घेऊयात की कशा प्रकारे ती संभावना सत्यात उतरू शकते.सध्या सुरू असलेल्या आशिया कप ( Asia Cup) क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात भारतीय संघाने अटीतटीच्या लढतीत पाकिस्तानचा पराभव केला. हार्दिक पंडयाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर ते शक्य झाले. भारतीय क्रिकेट रसिकांनी या विजयानंतर जल्लोष केला. तर पाकिस्तान संघाच्या समर्थकांच्या पदरी मात्र निराशाच पडली.

आशिया कप स्पर्धा ही ‘अ’ आणि ‘ब’ अशा दोन गटात विभागली गेली आहे. ‘अ’ गटामध्ये भारतीय संघाने पाकिस्तान आणि हाँगकाँगच्या संघाला नमवून अंतिम चार संघात आपले स्थान निश्चित केले आहे. तर ‘ब’ गटामध्ये श्रीलंका आणि अफगाणिस्तानच्या संघानी अंतिम चार संघात आपले स्थान पक्के केले आहे.

पाकिस्तानच्या संघाचा आज हाँगकाँगशी सामना आहे. हया सामन्याच्या विजेत्या संघाची रविवारी भारताशी लढत होईल. जर पाकिस्तानने आजच्या सामन्यामध्ये हाँगकाँगला नमवले तर आशिया कप स्पर्धेत रविवारी दुसऱ्यांदा पाकिस्तान आणि भारतीय संघ एकमेकांशी भिडतील.

हे सुद्धा वाचा

Asia Cup : भारत-हाँगकाँग आशिया कपमध्ये हार्दिक पंड्याच्या जागी ऋषभ पंतची एन्ट्री

Eknath Shinde : एकनाथ शिंदे गोरगरीबांचे कैवारी वाटतात का ? जाणून घ्या सामान्य लोकांच्या इरसाल प्रतिक्रिया

Nana Patole : हिंदुत्त्वाचा डंका मिरवणाऱ्या इव्हेंटबाज सरकारनेच हिंदू शेतकऱ्यांना सोडले वाऱ्यावर- नाना पटोले

अंतिम चार साखळीत प्रत्येक संघ बाकीच्या तीन संघाशी प्रत्येकी एक सामना खेळेल. जर त्या साखळी फेरीत भारत आणि पाकिस्तानच्या संघाने प्रथम दोन स्थानावर आपली जागा निश्चित केली तर ११ सप्टेंबरला होणाऱ्या अंतिम सामन्यात ते एकमेकांशी स्पर्धेत तिसऱ्यांदा समोरासमोर येण्याची दाट शक्यता आहे. जर असे झाले तर क्रिकेट रसिकांना ती एक वेगळीच पर्वणी असेल.

हया सर्व समीकरणांपासून वेगळा विचार केला तर भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या संघाला अफगानिस्तानच्या संघाशी सावध राहण्याची गरज आहे कारण ते स्पर्धेत ‘जांयट किलर’ ठरू शकतात. कारण साखळी सामन्यामध्ये अफगानिस्तानच्या संघाने श्रीलंकेच्या संघाचा ८ गडी राखून आणि बांग्लादेशच्या संघाचा ७ गडी राखून विजय संपादन करून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

टीम लय भारी

Recent Posts

शहरातील जीर्ण वाड्याबाबत मनपा उदासीन; नागरिक धोक्यात

नियमाप्रमाणे महापालिका हद्दीतील एखाद्या इमारतीचे ३० वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान झाल्यास स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे आहे.…

9 hours ago

सिडको गोळीबार प्रकरणातील ८ जणांवर मोक्का

गुन्हेगारी टोळीतील आठ आरोपींना बंदुकीने फायर करणे महागात पडले. या आरोपींना  माेक्का (MCOCA) लावण्यात आला…

9 hours ago

कर्नाटकातील अत्याचार हा नारीशक्तीचा अपमान;काँग्रेस प्रवक्ता प्रगती अहिर यांची भाजपावर टीका

भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले…

10 hours ago

सिडको विभागात सायकल रॅलीसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली.

याअंतर्गत स्वीप उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत नवीन नाशिक विभागात महिला बचत…

10 hours ago

पोटच्या मुलीलाच देहविक्रीस भाग पाडून तिच्या जन्मदात्यांनी विकलं

पालघर मधून एक धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आलीये. स्त्रियांवर आणि बालकांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ…

13 hours ago

अश्रू, तुझा खरा रंग कंचा ? रोहित पवारांचा की अजित पवारांचा ??

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सपाटून मार खाल्ला होता. अशातच अजितदादांच्या मागं…

13 hours ago