टीम लय भारी
मावळ : पीएमआरडीचा प्रस्तावित आराखडा जाहीर झाला असून त्यात १ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचे आरोप ऍड आशिष शेलार यांनी केले आहेत. शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात आरक्षणे काढून खोट्या नामधारी शेतकऱ्यांना दाखवून त्यांच्यासाठी निवासी जागा म्हणून सदर पत्ता जाहीर केला आहे (Ashish Shelar to put strong Allegation of Rs 1,000 crore scam in PMRD’s plan).
ही घटना मावळ प्रातांत घडली असून जवळ जवळ १ हजार कोटीइतका घोटाळा झाल्याचे समजते. कामशेत, मावळ येथे समर्थ बुथ अभियान कार्यकर्ता मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार आशिष शेलार उपस्थितीत होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
जयंत पाटील यांनी किरीट सोमय्या यांचा घेतला समाचार
विजय वडेट्टीवार यांनी मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदी केली बोगस प्राध्यापकाची नियुक्ती
मावळ तालुक्यातील बूथ प्रमुखांचे चेहरे पाहिल्यावर मावळात कमळ फुलेल, असा विश्वास नक्की वाटतोय. असे ते यावेळी म्हणाले. सध्याच्या सरकारवर टीका करताना ते पुढे म्हणाले, हे तीन पक्षाचं सरकार घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज आहे. एमपीएससी परीक्षेची तौरी करणाऱ्या स्वप्नील लोंकरला दिलेले वाचन सुद्धा ते पूर्ण करू शकले नाहीत ही या सरकारची दुर्दैवी बाब आहे.
महाविकास आघाडीतील तीन पक्षात आपसांत रोज लढाई लागलेली आहे. त्यातील दोन पक्षांचे जे संकेत मिळत आहेत. या सर्वांचा अभ्यास केला तर असे अनुमान काढता येईल की, राज्यात कधीही निवडणूक लागू शकतात, त्यामुळे जेव्हा केव्हा निवडणूका लागतील तेव्हा मावळमध्ये भाजपाचा आमदार निवडून आणायचा आहे, असे उद्गार आशिष शेलार यांनी काढले.
अमित देशमुख यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची केली पाहणी
शेतजमिनी, शेतघरे याची आरक्षणे बदलून शेतकऱ्यांना मारक ठरतील आणि अल्पभूधारक शेतकरी उध्वस्त होईल अशी आरक्षणे टाकली जात आहेत. एका शेतकरी परिवाराची अंदाजे 1 हजार एकर शेतजमीन निवासी म्हणून कशी खुली करण्यात आली? असा प्रश्न विचारून ते पुढे म्हणाले, हा सगळा दहा हजार कोटीचा मामला आहे.
यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे, दिगंबर भेगडे, पुणे ग्रामीण अध्यक्ष गणेश भेगडे इत्यादी मान्यवर उपस्थितीत होते.