33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयठाकरे सरकार हे बगलबच्च्यांचे सरकार, चित्रा वाघ यांची बोचरी टीका

ठाकरे सरकार हे बगलबच्च्यांचे सरकार, चित्रा वाघ यांची बोचरी टीका

टीम लय भारी

मुंबई : भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी सरकार हे लोक धार्जिणे सरकार नाही तर, सत्ताधाऱ्यांचे आमदार, मंत्री यांचे बगलबच्चे धार्जिणे सरकार आहे. असे चित्र वाघ यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला आहे (Chitra Wagh criticizes Mahavikas Aghadi government).

संजय राऊत यांनी आपल्या विधानात म्हटले होते की, आतापर्यंतच्या सरकारमध्ये महाविकास आघाडीचे सरकार हे स्त्रियांच्या बाबतीत अतिशय संवेदनशील आहे. या वक्तव्यावर चित्रा वाघ यांनी हे सरकार आमदार आणि मंत्र्यांचे धार्जिणे सरकार असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी महाविकास आघाडी सरकार हे महिलांचे खच्चीकरण करते असे म्हटले आहे. त्यासाठी त्यांनी ज्योती देवरे नावाच्या महिला तहसीलदार यांचे उदाहरण दिले आहे. तसेच आताच्या राज्य सरकारने महिला आयोगाला अध्यक्ष पद दिले नसल्याचे हि त्यांनी सांगितले.

भाजप सरकारने मागच्याच वर्षी शिवाजी महाराजांचा पुतळा उखडला तरीही तुम्ही भाजपाला सपोर्ट करता ?

आमदार रोहित पवारांनी निर्मला सितारामण यांची घेतली भेट

त्याचबरोबर भय इथले संपले नाही व राज्यातील महिला आणि मुलींवर अत्याचार हे सुरूच आहे असे चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी दहिसर येथे ७ वर्षीय मुलीवर तर बोईसर येथे १२ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याचेही त्यांनी ट्विटमध्ये लिहले आहे.

निजामविरोधी लढ्यातील योद्धयांना स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान द्यावा, मराठवाडा मुक्ती संग्राम स्मारक समितीने केली मागणी

BJP MLA lodges complaint against Uddhav Thackeray for ‘making controversial remark against migrants’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी