टीम लय भारी
मुंबई : मुंबई पोलीस आणि मुंबईविषयी केलेल्या विधानांमुळे चर्चेत आलेल्या अभिनेत्री कंगना रणौतनं पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. (Gundaraj in Mumbai, Chief Minister incompetent!) (Kangana’s attack via ‘tweet’) मुंबईत गुंडाराज (Gundaraj) चालू असल्याचा आरोप करत कंगनानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्री असा उल्लेख करत टीका केली आहे. साहिल चौधरीला अटक केल्यानंतर कंगनानं ट्विट केलं असून, काँग्रेसला सवाल केला आहे.
https://twitter.com/KanganaTeam/status/1310814067544608768
हरयाणातील यू-ट्यूबर साहित चौधरी यानं महाराष्ट्र सरकारवर टीका केली होती. या प्रकरणात साहिल चौधरीला अटक करण्यात आल्यानंतर कंगनानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. ‘मुंबईत हे काय गुंडाराज सुरू आहे. जगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यंत्र्यांना व त्यांच्या टीमला कुणीही प्रश्न विचार नाहीये. त्यांनी आमच्यासाठी काय केलं? आमचं घर तोडलं आणि आम्हाला मारलं? याला उत्तरदायी कोण आहे, असा प्रश्न कंगनानं काँग्रेसला विचारला आहे.
‘साहिलनं महाराष्ट्र सरकारला त्यांच्या कामावरून प्रश्न विचारले म्हणून कुणीतरी त्यांच्याविरोधात अचानक गुन्हा दाखल केला, जो की त्याचा लोकशाही अधिकार आहे. त्यानंतर साहिलला तत्काळ तुरूंगात टाकण्यात आलं. पण, पायल घोषनं अनुराग कश्यपविरोधात अनेक दिवसांपूर्वी बलात्तकाराचा गुन्हा दाखल केला आहे. पण, तो मुक्तपणे फिरतोय. हे सगळं काय आहे,’ असा सवाल कंगनानं काँग्रेसला केला आहे.