31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीय‘राज ठाकरेंच्या कानाला मशिदीवरील भोंग्यांचा आताच त्रास का व्हायला लागला ?’

‘राज ठाकरेंच्या कानाला मशिदीवरील भोंग्यांचा आताच त्रास का व्हायला लागला ?’

टीम लय भारी

औरंगाबाद : राज ठाकरे काँग्रेसच्या व्यासपीठावर जात होते. सेक्यूलरची भाषा बोलत होते. आताच त्यांना मुसलमानांचा द्वेष का वाटू लागला आहे. ते इतक्या दिवसांपासून राजकारणात आहेत, मग मशिदीवरील भोंग्यांचा त्रास त्यांना आताच का व्हायला लागला आहे, असा सवाल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी केला आहे.

जलील पुढे म्हणाले की, यापूर्वी राज ठाकरे काँग्रेससोबत जुळवून घेत होते. लोक सुद्धा मोठ्या संख्येने त्यांची भाषणे ऐकायला यायचे. पण त्यांना मते मिळाली नाहीत. आता शिवसेना काँग्रेस – राष्ट्रवादीसोबत सरकारमध्ये सामील झाली आहे. त्यामुळे राजकीय कारणासाठी राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. मुसलमानांनी भारतात राहायचे की नाही ते एकदा तुम्ही ठरवा. तुमचेच सरकार केंद्रात आहे. भोंगे लावू नयेत असा कायदा तुम्ही आता करा, असाही टोला जलील यांनी लगावला.

हे सु्द्धा वाचा

उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही भगवा रंग बदललेला नाही

राज ठाकरेंची नवी गर्जना : हिंदूना नख लावाल, तर हिंदू म्हणून अंगावर जाईन

मनसेच्या नेतेपदी अमित ठाकरे यांची नियुक्ती, मनसेच्या नवा झेंड्याचेही अनावरण

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी