31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीय'नारायण राणेंसारखे भित्रे लोक आता मंत्रिमंडळात‌ राहिलेले नाहीत' नवाब मलिकांचे नारायण राणेंना...

‘नारायण राणेंसारखे भित्रे लोक आता मंत्रिमंडळात‌ राहिलेले नाहीत’ नवाब मलिकांचे नारायण राणेंना खरमरीत प्रत्युत्तर

विमल पाटील : टीम लय भारी

मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. नारायण राणेंसारखे भित्री माणसं आता मंत्रिमंडळात राहिलेली नाहीत. ते घाबरले म्हणून भाजपात प्रवेश करून मंत्रीपद मिळवलं, त्यामुळे राणे काहीही बोलत असल्याची टीका मलिक यांनी केली आहे (Nawab Malik’s responded to Narayan Rane).

मलिक म्हणाले की, ‘केंद्रीय मंत्रिपदाच्या स्वरूपात भाजपाकडून बक्षिसी मिळाली म्हणून ते काहीही बोलत आहेत.’ राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो. कारवाईच्या भीतीपोटी ज्यांनी पक्ष‌प्रवेश करुन मंत्रिपद मिळवलं त्यांनी आम्हाला काही सांगायची गरज‌ नाही, असे म्हणत मलिक यांनी राणेंना डिवचले आहे.

“बात निकलेगी तो फिर…”, नवाब मलिक यांच्या नव्या ट्वीटमुळे पुन्हा खळबळ

फडणवीसांच्या इशाऱ्यावरच राज्यात ड्रग्जचा खेळ सुरू, नवाब मलिक यांचा गौप्यस्फोट

नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत ठाकरे सरकार पाच पुर्ण करेल असे वाटत नाही. सरकार कोणत्याही क्षणी जाईल,असा दावा करत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. राणे यांच्या या दाव्यावर प्रत्युत्तर देत म्हणाले की, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे सरकार 25 वर्ष चालणार असल्याचं म्हटलंय. त्यामुळं नारायण राणेंनी सरकार कधी पडणार याची काळजी करु नये.’

नवाब मलिकांनी कॉर्डेलिया क्रूझवरील पार्टीतील व्हिडीओ केला शेअर; म्हणाले…

“Secrets In Hotel”: Maharashtra Minister Nawab Malik Teases “Expose”

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर नारायण राणे तारखा देत होते. आता सरकार पडणार मग पडणार, अशा तारीख पे तारीख देण त्यांच्याकडून सुरु होते. मात्र, राणेसाहेब तुमच्यासारखे भित्रे लोक आता राहिलेले नाहीत. हे सरकार 25 वर्ष चालणार आहे त्यामुळे भित्रे लोक ज्यांनी पक्षातंर केलं त्यांना झोपा लागत नाहीत, असे म्हणत नारायण राणे यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केलेल्या इतर नेत्यांना चिमटा काढला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी