स्वयंपाकासाठी आवश्यक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीने दोन वर्षांत आकाश गाठले आहे. यामुळे गेल्या 24 महिन्यांत सततच्या चढ-उतारानंतर घरगुती गॅस सिलिंडर 90% तर व्यावसायिक 111% नी महागले आहे. या काळात घरगुती गॅसची किंमत 524 रुपयांनी तर व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1094 रुपयांनी वाढली. भविष्यात किमती कमी होण्याची सुतराम शक्यता नाही. या महागाईमुळे घरोघरीचे बजेट मात्र कोलमडले आहे. त्याचप्रमाणे गेल्या दोन वर्षात घरगुती गॅसच्या दरात 18 वेळा दरवाढ करण्यात आली तसेच व्यावसायिक गॅसच्या दरात 27 वेळा दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे कुठे गेले ते अच्छे दिन, असा संतप्त सवाल राष्ट्रवादीने (NCP) सरकारला केला आहे. एकेकाळी गॅस दरवाढीमुळे रणकंदन करणारे भाजपचे नेते (BJP) आता गॅस दरवाढ झाल्यावर गप्प का बसलेत? हेच का ते अच्छे दिन, असा सवाल राष्ट्रवादीकडून भाजप सत्ताधाऱ्यांना करण्यात आला आहे.
गॅस सिलेंडरचे दर अटोक्यात आणण्याचा प्रयत्न कुठेच झालेला दिसून आला नाही. विशेषतः मागच्या दोन वर्षात (1 मार्च 2020 ते 1 मार्च 2023 कालावधीत) घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत केवळ एकदाच घट झाली ती देखील केवळ 10 रुपयांची, असे राष्ट्रवादीने सूचित करून दिले आहे. (gas price hike)
1 मार्चपासून 14.2 किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ झाली. यामुळे फेब्रुवारीपर्यंत मुंबईत प्रति सिलिंडरची किंमत 1052.50 रुपयांवरून थेट 1102.50 रुपयांवर पोहोचली. तर, 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 350 रुपयांची वाढ होऊन ती 1721 रुपयांवरून 2071.50 रुपयांवर पोहोचली. वरवर पाहता ही वाढ 50-70 रुपयांची दिसत असली तरी गेल्या दोन वर्षांत हळूहळू घरगुती गॅस 90% तर व्यावसायिक 111% महागल्याचे दिसत आहे. देशात सरकारी मालकीच्या इंडियन ऑइलचे इंडेन, भारत पेट्रोलियमचे भारत गॅस तर हिंदुस्तान पेट्रोलियमचे एचपी गॅस बाजारात आहेत. त्यामुळे एकंदरीत सामान्य माणूस अक्षरशः रडकुंडीला आला आहे.
हे सुद्धा वाचा :
कृषीमंत्री अब्दुल सत्तारांची हकालपट्टी करा; विधानभवनाच्या पायऱ्यांवर NCPचा राडा
गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना सहकार खात्याने मोठा धक्का दिला आहे. एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (ST…
उन्हाच्या वाढत्या झळांसोबतच नाशिककरांवर पाणी कपातीची ( Water crisis ) टांगती तलवार कायम आहे. त्यातच…
मनपा करसंकलन (Municipal Tax) विभाग जाहिरात करात दहा टक्के वाढ करणार असून आचारसंहितेनंतर हा प्रस्ताव…
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला सत्र, उच्च व सर्वोच्च अशा न्यायालयांच्या तिन्ही पातळ्यांवर…
मुंबईवरील दहशतवादी हल्ला पाकिस्ताननेच घडविला हे संपूर्ण जग जाणते, खुद्द पाकिस्ताननेही याचा इन्कार केलेला नाही,…
अयोध्या येथील श्रीरामजन्म भूमी न्यासाचे खजिनदार आणि जगभरात गीतेचा प्रसार करणारे स्वामी गोविंददेवगिरी महाराज (Swami…