34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमुंबईआता माझी सटकली, लेटरबॉम्बवर संजय राऊत काय म्हणाले?

आता माझी सटकली, लेटरबॉम्बवर संजय राऊत काय म्हणाले?

टीम लय भारी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कायम सरकारची प्रतिमा चांगली ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. सत्तेवर बसलेल्यांना आता आम्हीच तेवढे शहाणे आहोत असे वाटायला लागले आहे. याचे आत्मपरिक्षण आता सर्व घटकांनी करायलाच हवे, असे खडे बोल सत्ता स्थापनेत मुख्य भुमिका निभावणारे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्याच सहका-यांना सुनावले आहेत.

मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र पाठवले. या पत्रात थेट राज्याच्या गृहमंत्र्यांवरच गंभीर आरोप त्यांनी केले आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही संशय व्यक्त केला आहे. या पत्राची खातरजमा केली जात असली, तरी ठाकरे सरकारसमोर संशयाचे डोंगर उभे राहिले आहे. या संपूर्ण प्रकरणावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाआघाडी सरकारमधील सर्व घटकांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे.

“सचिन वाझे प्रकरण आणि परमबीर सिंह यांच्या पत्रामुळे राज्य सरकारवर शिंतोड उडाले आहेत. त्यामुळे आता सरकारमधील मंत्र्यांनी आपले पाय जमिनीवर आहेत का, ते तपासून पाहायला हवे. सरकारमधील प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. पोलीस खाते हे राज्याचा कणा असतो. स्वाभिमानाचे प्रतिक असते. हा कणा राज्यकर्त्यांनी मजबूत ठेवायचा असतो. सध्याची परिस्थिती पाहता काहीतरी दुरुस्त करावं लागेल,” असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

“परमबीर सिंह हे माजी पोलीस आयुक्त होते. ते एक उत्तम अधिकारी आहेत. त्यांनी आतापर्यंत उत्तम सेवा बजावली आहे. मात्र, परमबीर सिंह यांनी पत्रात लिहीलेल्या गोष्टींची सत्यता पडताळावी, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ही सत्यता पडताळून पाहतील. विरोधी पक्षाच्या मागणीवर सरकार चालत नाही किंवा सरकारमध्ये उलथापालथ होत नाही. मी चहाला उधार नाही, पण या पत्राने सरकारवर शिंतोडे उडवले ही बाब मी मान्य करतो. हे सरकार स्थापन करण्यात खारीचा वाटा उचलणाऱ्या पण सरकारबाहेर असणाऱ्या माझ्यासारख्या हितचिंतकांसाठी ही धक्कादायक गोष्ट आहे,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कायम सरकारची प्रतिमा चांगली ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गोष्टी घडल्या. या सगळ्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे होते. पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. जगभरात सत्तास्थानी बसल्यावर अनेकांना आपण शहाणे असल्याचे वाटायला लागते, हे या प्रकरणाच्या निमित्ताने दिसून आले. या सगळ्या प्रकरणात शरद पवार योग्य भूमिका आणि निर्णय घेतील. मी आज दिल्लीत जाणार आहे. त्यावेळी शरद पवार यांच्याशी या विषयावर बोलण्याचा प्रयत्न करेन,” असेही राऊत यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी