टीम लय भारी
मुंबई : महावितरणच्या प्रलंबित भरती प्रक्रियेतील ७ हजार जागा येत्या आठ दिवसांत भरण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. यामुळे वर्षभर रखडलेली ही भरतीप्रक्रिया आता पूर्ण होणार असून निवड प्रक्रियेतील उमेदवारांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महावितरण कंपनीत जुलै 2019 मध्ये दिलेल्या जाहिरातीनुसार 2000 उपकेंद्र सहाय्यक व 5000 विद्युत सहाय्यक या पदांसाठी सरळ सेवेची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रलंबित भरती प्रक्रियेचा निकाल तात्काळ जाहीर करून 8 दिवसात संबधितांना सेवेत रूजू करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले. pic.twitter.com/P0crm47zrU
— Dr. Nitin Raut (@NitinRaut_INC) June 23, 2020
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी याबाबत ट्विट करुन ही माहिती दिली आहे. महावितरणने जुलै २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करून २ हजार उपकेंद्र सहायक आणि ५ हजार विद्युत सहाय्यकांची सरळसेवा भरती प्रक्रिया राबविली होती. या प्रलंबित भरती प्रक्रियेचा निकाल तात्काळ जाहीर करून ८ दिवसांत संबंधितांना रूजू करून कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.