31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeटॉप न्यूजदेवेंद्र फडणवीस पराभवातून सावरलेले नाहीत : मनसेचा टोला

देवेंद्र फडणवीस पराभवातून सावरलेले नाहीत : मनसेचा टोला

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : विधानसभा अधिवेशन कालावधीमध्ये गेल्या दोन दिवसांत देवेंद्र फडणवीस यांचा वावर नेहमीपेक्षा वेगळा होता. फडणवीस यांचा हा बदललेला चेहरा सामान्य लोकांच्या नजरेत आला, तसा तो मनसेच्याही पदाधिकाऱ्यांनी टिपला. ‘देवेंद्र फडणवीस पराभवाच्या धक्क्यातून अजून सावरलेले दिसत नाहीत, कितीही नाही म्हटलं तरी त्यांचा चेहरा सगळं काही सांगून जात होता’, अशा शब्दांत मनसेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांनी चिमटा काढला आहे.

काळे यांनी ट्विटरद्वारे फडणवीस यांना डिवचले आहे. पण सोबतच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही टपली मारली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही आता अभ्यास करावा लागेल. सेनेच्या सभेत बोलणे आणि विधिमंडळात बोलणे यातील फरक त्यांना समजून घ्यावा लागेल, असा सल्ला काळे यांनी दिला आहे.

गेल्या महिनाभरात राज्यात सत्तासंघर्ष टिपेला पोहोचला होता. आमदारांची बेरीज वजाबाकी सुरू झाल्याने छोट्यातल्या छोट्या पक्षाचेही महत्व वाढले होते. मनसेकडेही एक आमदार आहे. परंतु महाविकास आघाडी व भाजप अशा दोन्हीही सत्ता केंद्रांपासून मनसेने समान अंतर राखणे पसंत केले आहे. शनिवारी झालेल्या बहुमत चाचणीत सुद्धा मनसेचे एकमेव आमदार तटस्थ राहिले होते.

त्यानंतर रविवारी गजानन काळे यांनी देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे अशा दोघांवरही टीका केली आहे. यावरून मनसे येथून पुढे सत्ताधारी व विरोधक अशा दोघांशीही संघर्षाचा भूमिकेत राहिल असेच दिसते.

हे सुद्धा वाचा

‘फडणवीसांच्या नशिबात काय लिहिलंय, हे सटवीलाच माहित’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी