मृगा वर्तक : टीम लय भारी
मुंबई :- मालदीव मध्ये सत्तारुढ असलेला पक्ष एमडीपी मालदीवियन डेमॉक्रॅटिक पार्टीने स्थानिक माध्यमात भारतविरोधी चुकीचा दावा केला. त्याबद्दल भारताने परराष्ट्रमंत्री आणि मालदीव सरकार विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली (India expressed strong resentment against the Foreign Minister and the Maldivian government).
मालदीवच्या आशा वक्तव्यांमुळे अनेक दशकांपासून चालत आलेले भारत-मालदीव संबंध विस्कटू शकतात. सध्या मालदीवला भारतासारख्या प्रगतिशील देशाच्या मदतीची गरज लागणार असताना आंतरराष्ट्रीय संबंधांवर वाद उपस्थित व्हायला नकोत.
दारे खिडक्या असता बंद, पाठविले ऐसे गतीमंद; मिटकरींनी काढला पडळकरांना चिमटा
‘ही कारवाईची सुरूवात आहे, यादी मोठी आहे आणि सर्व रडारवर आहेत’ : चंद्रकांत पाटील
मालदीव हे अनेक लहान लहान बेटांचे मिळून बनलेले एक राष्ट्र आहे. भारताच्या दक्षिणेला असलेली ही बेटे फिरत्या निसर्गचक्रामुळे धोक्यात आली आहेत. येत्या काही वर्षांत मालदीव संपूर्णपणे पाण्याखाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मालदीव हा देश इतर देशातील पर्यटकांसाठी आपले सुंदर समुद्र खुले करून अर्थव्यवस्था चालवत आहे (The Maldives is running its economy by opening its beautiful seas to tourists from other countries).
प्रश्न विचारायचा असेल तर आधी मुख्यमंत्री करा, संभाजीराजे भडकले…
Maldives to welcome Indian travellers from July 15
तसेच येत्या शतकांत सगळीच बेटे पाण्याखाली गेल्यानंतर मालदीवचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी इतर देशांकडे मदतीचा हात मागताना दिसतात. इतर राष्ट्रांनी मालदीवला मदत करायची तयारी दाखवली तरी त्यांचे स्वतंत्र अस्तित्व मान्य केलेले नाही. दुसऱ्या कोणत्याही देशात राहावयाचे असल्यास त्या देशातील नागरिकत्व घेणे मालदीवियन्सना बंधनकारक राहील. अशा परिस्थितीत मालदीवला फक्त भारताकडून मदतीची आशा आहे. भारताबरोबरचे आंतरराष्ट्रीय संबंध बिघडल्यास मालदीववर पश्चातापाची पाळी येऊ शकते (Maldives could face remorse if international relations with India deteriorate).