टीम लय भारी
नवी दिल्ली: भाजपा खासदार वरुण गांधी विरुध्द भाजप असा वाद सध्या सुरु आहे. लखीमपूरमध्ये मंत्रीपुत्राने शेतक-यांना चिरडल्याप्रकरणी वरुण गांधी यांनी ट्विट केल्यानंतर केंद्रीय कार्यकारणीतून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. (varun gandhi tweeted on behalf farmers)
राजधानी दिल्लीच्या सीमारेषेवर तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी जवळपास वर्षभरापासून सुरू केलेल्या आंदोलनाला वरुण गांधींनी आपला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका देखील केली आहे.
शिवसेना नेत्या मनीषा कायंदेंकडून भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर खरमरीत
पंकजा मुंडेंचा फडणवीसांना टोला;…. मी कोणत्याही मंत्रिपदावर नाही याचं दु:ख नाही!
त्यामुळे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाची नाराजी देखील त्यांनी वारंवार ओढवून घेतली आहे. यानंतर आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर केंद्राकडून घेतल्या जाणाऱ्या भूमिकेवर वरुण गांधी यांनी निशाणा साधला असून यासाठी त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा एक जुना व्हिडीओ ट्वीट केला आहे.
काय आहे या व्हिडीओमध्ये?
वरुण गांधी यांनी हा व्हिडीओ शेअर करताना “एका विशाल ह्रदयाच्या माणसाचे शहाणपणाचे शब्द”, असा मेसेज लिहिला आहे. या व्हिडीओमध्ये अटल बिहारी वाजपेयींनी तत्कालीन इंदिरा गांधी सरकारवर टीका करताना शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्याचा मानस स्पष्ट केला आहे. “मी सरकारला इशार देतो की तुम्ही या दबाव टाकण्याच्या पद्धती सोडून द्या. घाबरवण्याचा प्रयत्न करू नका. शेतकरी घाबरणार नाहीत”, असं अटल बिहारी वाजपेयी या व्हिडीओमध्ये म्हणत आहेत.
आर्यन खानला एनसीबीने सुपर डुपर स्टार बनवलं, राम गोपाल वर्मा यांचे ट्वीट चर्चेत
Wise words from a big-hearted leader… pic.twitter.com/xlRtznjFAx
— Varun Gandhi (@varungandhi80) October 14, 2021
Sidelined, BJP’s Varun Gandhi Doubles Down With Vajpayee Video On Farmers