टीम लय भारी
मुंबई : ‘लॉकडाऊन’मुळे ( Lockdown2 ) अडकलेल्या मजुरांसाठी रेल्वे सुरू होणार असल्याची बातमी दिल्या प्रकरणी एका वृत्तवाहिनीच्या वरिष्ठ पत्रकाराला पोलिसांनी पहाटे अटक केली आहे. या बातमीमुळे वांद्रे रेल्वे स्थानक परिसरात मंगळवारी मोठी गर्दी उसळल्याचे प्राथमिक कारण समोर आले होते. त्यामुळे पोलिसांनी ही अटक केली आहे.
संबंधित पत्रकार हा उस्मानाबाद येथील होता. त्यामुळे उस्मानाबाद पोलिसांनी पहाटे चार वाजता अटक केली. त्यानंतर संबंधित पत्रकाराला पोलिसांनी मुंबईत आणले आहे.
वांद्रे येथील गर्दी जमा केल्याप्रकणी विनय दुबे नावाच्या एका व्यक्तीलाही पोलिसांनी अटक केली आहे. उत्तर भारतीय महापंचायत या संघटनेचा दुबे हा प्रमुख आहे. दुबे याला न्यायालयाने 21 एप्रिलपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
.@abpmajhatv needs to clarify this. https://t.co/Nl8veVoFG9
— nikhil wagle (@waglenikhil) April 15, 2020
दरम्यान, ‘कोरोना’मुळे जागतिक संकट कोसळले आहे. देशात व महाराष्ट्रात लॉकडाऊन ( Lockdown2 ) सुरू आहे. पण या लॉकडाऊनच्या ( Lockdown2 ) संवेदनशील काळातही सामाजिक व धार्मिक विद्वेष पसरेल अशा पद्धतीने काही पत्रकार बातम्या देत आहेत. कलह निर्माण करणाऱ्या अशा बातम्यांमुळे पोलिसांनी आता कडक पाऊले उचलली आहेत.
Y'day, @ABPNews first peddled a fake story about "special trains for stranded migrants in Maharashtra" & then used the public disorder it created to further incite people.
I've issued a notice to the channel returnable within 7 days for regulatory & criminal proceedings.
(1/3) pic.twitter.com/JEjc4ucNN0
— Saket Gokhale (@SaketGokhale) April 15, 2020
एका मराठी वृत्तवाहिनीचे संपादक व दुसऱ्या वृत्तवाहिनीच्या डेप्युटी एडीटरबाबतची माहिती पोलिसांनी जमा केली आहे. या दोन वरिष्ठ पत्रकारांनी यापूर्वी दिलेल्या बातम्या व ‘कोरोना’ संकटकाळातील बातम्यांची पडताळणी पोलिसांनी केली आहे. कुणाच्या सांगण्यावरून हे संपादक व डेप्युटी एडिटर आपल्या वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बातम्या’ पेरण्याचे काम करीत आहेत याचीही तपासणी पोलीस करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा
Lockdown2 : मजुरांसाठी रेल्वे सुटणार असल्याच्या चुकीच्या ‘बातमी’ने वांद्रे स्थानकात उसळली गर्दी
Covid19 : उद्धव ठाकरेंचा इशारा, आग भडकविण्याचे काम करू नका, मी सहन करणार नाही