टीम लय भारी
मुंबई : कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातील जनतेशी फेसबूकद्वारे संवाद साधत आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीलाच या परिस्थितीत साथ देणा-या सर्वांचे आभार मानले.
https://www.facebook.com/CMOMaharashtra/videos/244380163303584/
महत्वाचे मुद्दे….
मनुष्यबळ कमी पडत असेल तर भूमीपुत्रांनो पुढे या.
महाराष्ट्र पुन्हा उभा करण्यासाठी ग्रीन झोनमधील तरुणांनी आत्मविश्वासाने बाहेर पडा.
राज्यात नवीन उद्योगपर्व.
नवीन उद्योजकांना भाडे तत्वावर जमीन मिळेल.
नवीन उद्योजकांचे महाराष्ट्रात स्वागतच होईल.
फक्त प्रदूषण न करण्याची अट राहील.
ग्रीन इंडस्ट्रीसाठी कोणत्याही अटी नाहीत.
महाराष्ट्रात 40 हजार एकरहून अधिक जमीन उद्योगांसाठी राखीव.
नवीन सरकारच्या योजना या कोणत्याही परिस्थितीत अंमलात आणल्या जाणारच.
नवीन सरकार असताना आणि नवीन स्वप्न आहेत.
सगळीकडे निर्बंध असतील तरी काही ठिकाणी उद्योग सुरू झाले आहेत.
त्यात पाच लाख मजूर काम करायला लागले आहेत.
राज्यातील पन्नास हजार उद्योग सुरू करण्याची परवानगी.
एका बाजूला सगळं बंद करून हळूवार पणे काही गोष्टी सुरू करत आहोत.
रेड झोन मात्र शिथील करता येणार नाही.
ग्रीन झोनमधले निर्बंध आणखी शिथील होत आहेत. ऑरेंजमध्येही समान परिस्थिती आहे.
आपण कोरोनाच्या गुणाकारावर नियंत्रण ठेवलं आहे.
जर लॉकडाऊन केला नसता तर काय झालं असतं याचा विचार करवत नाही.
मनात प्रश्न उभे राहू शकतात की, नक्की काय सुरू आहे.
महाराष्ट्रात आजही रुग्णांची संख्या वाढत आहे.
कोरोनाविरुद्धचं युद्ध कधी संपेल याची कुणालाही कल्पना नाही.
17 तारखेला जुना लॉकडाऊन संपला आणि पुढचे पंधरा दिवस पुन्हा सुरू आहे.