टीम लय भारी
मुंबई : राज्यात कोरोनाचे (Coronavirus) संकट असतानाही सोशल मीडियावर जोरदार ‘ट्विटर वॉर’ सुरु आहे. यात राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे मागच्या काही दिवसांपासून दिसून येते. यात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे जोरदार बॅटींग करत चौकार, षटकार मारत असल्याने बीजेपी भक्तांना ते चांगलेच जिव्हारी लागल्याचे दिसून येते.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नेतृत्वात भाजपाच्या शिष्टमंडळाने मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी कोरोना संकट हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप केला. या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने कोणतेही विशेष पॅकेज जाहीर केले नाही, असे सांगत सरकारवर आरोप केले.
कोरोनाच्या या संकट काळात एखाद्या पक्षाच्या शिष्टमंडळाने जाण्याऐवजी जर देवेंद्र फडणवीस जी राज्याचे विरोधी पक्षनेते या भूमिकेतून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधायला गेले तर संवाद नक्कीच घडून येईल, अशी मला खात्री आहे.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 20, 2020
यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर दिले. त्यांनी ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस, जर आरोप-प्रत्यारोप सोडले तर आपण मांडलेले मुद्दे महत्त्वाचे असून त्यावर महाविकास आघाडी सरकार काम करत आहे. पण राज्याच्या काळजीपोटी वारंवार राज्यपालांकडे तक्रारी करण्यापेक्षा जबाबदार विरोधी पक्षनेता म्हणून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणे योग्य ठरु शकेल, असा टोला लगावला.
सरकार कोणत्याही पक्षाचं असो, राज्यातलं असो की केंद्रातलं असो, जनतेच्या हितासाठी राजकारण न करता @PawarSpeaks साहेब अनुभवाच्या बळावर नेहमीच अधिकारवाणीने सर्वांनाच योग्य मार्गदर्शन करत असतात. https://t.co/sCRQjbYUWn
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 20, 2020
त्यासोबतच शरद पवारांनी (Sharad Pawar) केंद्र सरकारला पत्र पाठवले, पवारांच्या दांडग्या अनुभवामुळे त्यांचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना नेहमीच मार्गदर्शक ठरत असते. त्यामुळे या पत्राची चिंता न करता राज्यासाठी आपण काय करतो, याचे आत्मपरीक्षण केले तर ते राज्यासाठी नक्कीच हितावह ठरेल असे मला वाटते, असा चिमटाही रोहित पवारांनी फडणवीस यांना लगावला.
यानंतर रोहित पवारांच्या टीकेला भाजपा आमदार मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी उत्तर दिले. देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेले मुद्दे महत्त्वाचे आहेत हे आपण मान्य केले हे योग्यच झाले. भाजपाने मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्यासाठी प्रयत्न केला पण त्याला अशी स्वयंअग्रेषित उत्तरे येतात असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलेला ई मेल जोडला. त्याचसोबत मागूनही वेळ मिळत नसेल तर काय करणार? तसेच शरद पवारांच्या मार्गदर्शनाची गरज आज राज्याला सर्वाधिक आहे. हे राज्याच्या स्थितीवरुन स्पष्ट होते असा टोला हाणला.
त्यावरही रोहित पवारांनी कोरोनाच्या संकटाशी संपूर्ण राज्य अहोरात्र लढण्यात व्यस्त असताना एकच दिवस आधी केलेल्या पत्रव्यवहाराचा योग्य रिप्लाय प्राप्त होण्यासाठीचा संयम नक्कीच आपल्याकडे असेल अशी अपेक्षा मी आपल्यासारख्या अनुभवी नेत्याकडून करतो असे प्रत्युत्तर दिले.
आमचे नेते मा. देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेले मुद्दे महत्त्वाचे आहेत, हे आपण मान्य केले, हे योग्यच झाले. भाजपाने मा. मुख्यमंत्र्यांशी सुद्धा संवाद करण्याचा प्रयत्न वारंवार केला. पण, त्याला अशी स्वयंअग्रेषित उत्तरे येतात.
मागूनही वेळ मिळत नसेल, तर काय करणार? @Dev_Fadnavis https://t.co/PWm5VqWVta pic.twitter.com/a5pzZNMmWQ— Mangal Prabhat Lodha (@MPLodha) May 19, 2020
त्याचसोबत सरकार कोणत्याही पक्षाचे असो, राज्यातले असो की केंद्रातले असो, जनतेच्या हितासाठी राजकारण न करता शरद पवार साहेब अनुभवाच्या बळावर नेहमीच अधिकारवाणीने सर्वांनाच योग्य मार्गदर्शन करत असतात, असेही रोहित पवारांनी स्पष्ट केल्याने भक्तांना ही टीका चांगलीच जिव्हारी लागली आहे.
धन्यवाद साहेब. आज आवश्यक असलेल्या या महत्त्वाच्या बाबीकडे आपण व्यक्तिशः लक्ष दिलंत.
काल मुख्यमंत्री साहेबांनीही उद्योगांबाबत केलेल्या घोषणा अत्यंत सकारात्मक आहेत. उद्योग विभागात अनेक बदल करावे लागतील व आपल्या नेतृत्वाखाली ते निश्चित होतील, असा विश्वास माझ्यासह अनेकजणांना वाटतो. https://t.co/57f1BZu1pY— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 20, 2020