आजच्या बजेटमधली तुमच्या आमच्या कामाची बातमी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सादर केलेल्या अर्थसंकल्पातील ही तशी लय भारी बातमी आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचे आता महिन्याला वाचू शकतील दहा हजार रुपये! कसे ते समजून घ्या …
महिन्याला दहा हजार रुपये वाचविण्यासाठी तुम्हाला पोस्टात गुंतवणूक करावी लागणार आहे. या निमित्ताने पोस्ट खात्यालाही पुन्हा एकदा चांगले दिवस येणार आहेत. आता महिन्याला 5 नव्हे तर पूर्ण 10 हजार रुपये कसे वाचतील, अर्थसंकल्पाच्या घोषणेचा कसा फायदा होईल, ते समजून घेऊया.
यंदाच्या अर्थसंकल्पात पोस्ट ऑफिस बचत योजनेत, म्हणजे पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीममध्ये (MIS) एकल खात्यांसाठी नवीन मर्यादा 4.5 लाख रुपयांवरून 9 लाख रुपये करण्यात आली आहे. संयुक्त खातेदारांसाठी ही मर्यादा आता 9 लाख रुपयांवरून 15 लाख रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे तुम्हाला दर महिन्याला चांगले उत्पन्न मिळवायचे असेल, तर पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्पात लघु बचत योजना असलेल्या पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेची (POMIS) मर्यादा वाढवली आहे. या योजनेत तुम्ही आता व्यक्तिगत खात्यात 9 लाख रुपये आणि संयुक्त खात्यात 15 रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. यानंतर तुम्हाला दरमहा 10 हजार रुपये मिळतील. या योजनेत फक्त एकदाच गुंतवणूक करून तुम्ही दर महिन्याला उत्पन्नाचा लाभ घेऊ शकता. कारण या योजनेत तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त व्याज मिळेल. नवीन वर्षाच्या मुहूर्तावर सरकारने या योजनेच्या व्याजदरात 0.4 टक्के वाढ केली होती. त्यामुळे आता 6.7 टक्क्यांऐवजी 7.1 टक्के दराने या योजनेवर वार्षिक व्याज मिळत आहे.
तुम्हाला एकरकमी गुंतवणूक करून पैसे कमवायचे असतील, तर पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना दरमहा तुमच्या उत्पन्नाचा स्रोत बनू शकते. या योजनेत नव्याने पैसे जमा करणाऱ्यांचे मासिक उत्पन्न वाढेल. येथे तुमची संपूर्ण गुंतवणूक सुरक्षित राहील आणि तुम्ही 5 वर्षांनंतर संपूर्ण रक्कम काढू शकता. यात एकल आणि संयुक्त खाती उघडण्याची सुविधा आहे.
हे सुद्धा वाचा :
रघुनाथ माशेलकर, प्रा. संजय धांडे, वसंत काळपांडे यांनी सांगितले अर्थसंकल्पातील फायदे-तोटे
मनपा करसंकलन (Municipal Tax) विभाग जाहिरात करात दहा टक्के वाढ करणार असून आचारसंहितेनंतर हा प्रस्ताव…
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला सत्र, उच्च व सर्वोच्च अशा न्यायालयांच्या तिन्ही पातळ्यांवर…
मुंबईवरील दहशतवादी हल्ला पाकिस्ताननेच घडविला हे संपूर्ण जग जाणते, खुद्द पाकिस्ताननेही याचा इन्कार केलेला नाही,…
अयोध्या येथील श्रीरामजन्म भूमी न्यासाचे खजिनदार आणि जगभरात गीतेचा प्रसार करणारे स्वामी गोविंददेवगिरी महाराज (Swami…
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. (Arvind Kejriwal has…
फेब्रुवारी महिन्यात राज्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बस स्टॅन्डचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले.…