27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeक्राईमनाशिक जिल्ह्यातून परराज्यात कामासाठी गेलेल्या तिघांचा अपघातात मृत्यू

नाशिक जिल्ह्यातून परराज्यात कामासाठी गेलेल्या तिघांचा अपघातात मृत्यू

गुजरात राज्यातील बारडोली शहराजवळ शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मालट्रकचा झालेल्या भीषण अपघातात बागलाण तालुक्यातील खमताणे येथील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण जखमी आहेत. याबाबत अधिक माहिती आशिक की, डाळिंब छाटणी करण्यासाठी बागलाण तालुक्यातील खमताणे परिसरातील छाटणी कामगार विरगाव येथील भाजीपाला वाहतूक करणाऱ्या ट्रकवर सुरत येथे निघाले होते. बारडोली जवळ ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाला.

गुजरात राज्यातील बारडोली शहराजवळ शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मालट्रकचा झालेल्या भीषण अपघातात (accident) बागलाण तालुक्यातील खमताणे येथील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण जखमी आहेत. याबाबत अधिक माहिती आशिक की, डाळिंब छाटणी करण्यासाठी बागलाण तालुक्यातील खमताणे परिसरातील छाटणी कामगार विरगाव येथील भाजीपाला वाहतूक करणाऱ्या ट्रकवर सुरत येथे निघाले होते. बारडोली जवळ ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाला.(Three killed in accident in Nashik district)

या अपघातात पिंटू पिराजी पवार (वय ४०, रा. खमताणे), सोनू एकनाथ मोरे (वय ३५, रा.खमताणे), भाऊसाहेब प्रताप बागुल (वय ५०, रा. खमताणे) यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच बाबाजी कडू पवार, भाऊसाहेब हिरामण पवार, आकाश माळी, तुळशीराम सोनवणे (रा. तळवाडे), दादा केरसानेकर आदी गंभीर जखमी झाले असून त्यांना सुरत येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, या भीषण अपघाताची माहिती घटनास्थळावर उपस्थित असलेल्या बागलाणमधील एका ट्रक चालकाने आमदार दिलीप बोरसे (MLA Dilip Borse) यांना देत मदतीची मागणी केली. त्यानंतर आमदार बोरसे यांनी तात्काळ बारडोली भाजप आमदार ईश्वरभाई परमार (MLA Ishwarbhai Parmar) यांच्याशी संपर्क साधून बागलाण तालुक्यातील अपघातग्रस्तांना मदत करण्याची विनंती केली. यानंतर आमदार परमार यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून जखमींना सुरत येथील शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर जखमींवर वेळीच उपचार झाल्याने त्यांचा जीव वाचला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी