महाराष्ट्र

अभिजित कांबळे यांना दीनमित्रकार मुकुंदराव पाटील राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार

दिनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीच्या वतीने सत्यशोधक विचारांशी बांधिलकी असणाऱ्या पत्रकारास व साहित्यास दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीच्या वतीने १९९५ पासून दरवर्षी पुरस्कार दिले जातात. यंदाचा राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’चे संपादक अभिजित कांबळे यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती स्मारक समितीचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी दिली. यापूर्वी दीनमित्रकार मुकुंदराव पाटील राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराने ज्ञानेश महाराव, संजय आवटे, संध्या नरे-पवार, विजय चोरमारे, सचिन परब यांना सन्मानित करण्यात आले आहे.

दीनमित्रकार सत्यशोधक मुकुंदराव पाटील पत्रकारिता पुरस्कार जेष्ठ पत्रकार व म.टा. ऑनलाइनचे संपादक अभिजित कांबळे (मुंबई) यांना जाहीर झाला आहे. तर साहित्य पुरस्कार दयाराम पाडलोस्कर, गोवा (बवाळ-कथा), प्रा. शिवाजीराव बागल, सोलापूर (ज्ञानमंदिरातील नंदादीप-कादंबरी), डॉ. नारायणा भोसले, मुंबई (देशोधडी -आत्मचरित्र), श्रीमती. सारिका उबाळे, अमरावती (कथार्सिस-काव्य), भारत सातपुते, लातूर (आम्ही फुले बोलतोय-बालकाव्य), प्रा. वसंत गिरी, बुलढाणा (तरुणांचे आयडॉल सुभाषचंद्र बोस-चरित्र), डॉ. प्रतिभा सुरेश जाधव, नाशिक (अस्वस्थतेची डायरी-वैचारिक लेखन), डॉ. तुकाराम रोंगटे, पुणे (आदिवासींचेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर-समिक्षा), राकेश सांळुके, सातारा (दख्खण समृद्ध प्रवास-प्रवासवर्णन), योगेश प्रकाश बिडवाई, मुंबई (कांद्याची रडकथा शिवार ते बाजार-संशोधन), डॉ. शिवलिंग मेनकुदळे,पुणे (प्रबोधनाचा वसा आणि वारसा-व्यक्तिवेध) यांना जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांचे वितरण रविवारी १८ डिसेंबरला तरवडी येथे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षीत यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती उपाध्यक्ष बाबा आरगडे यांनी दिली.
हे सुद्धा वाचा
होय, आम्ही ‘उजवेच’ आहोत… (आमदार ॲड्. आशीष शेलार यांचा विशेष लेख)
वडगाव मावळ सहायक निबंधक कार्यालयाला मिळेना अधिकारी; सर्वसामान्य नागिरकांच्या कामांचा खोळंबा
पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक नसल्याने महिला अत्याचाराच्या घटनांत वाढ, अत्याचार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना व प्रभावी अंमलबजावणीची गरज : प्रा. डॉ. मनीषा कायंदे

दिनमित्रकार मुकुंदराव पाटील हे महात्मा फुले यांच्या सत्यशोधक पत्रकारीचेचा वारसा चालविणारे विद्रोही पत्रकार होते. ग्रामीण भागातून देखील त्यावेळी त्यांनी पत्रकारिता करत बहुजन वर्गात विचारांचा जागर पेरला. महात्मा फुले यांचे कार्य मुकुंदराव पाटील यांनी आपल्या दिनमित्रमधूम पुढे नेले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.

टीम लय भारी

Recent Posts

नाशिक जळगाव जिल्ह्यातील आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण

भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे घरात झोपलेल्या आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण (baby abducted) झाल्यानंतर काही दिवसांतच अपहरण…

8 hours ago

सिडकोतील स्टेट बँक चौक चौपाटी येथे हातगाडीला आग

सिडकोतील स्टेट बँक चौक चौपाटीत (State Bank Chowk Chowpatty) मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास हातगाडीला लागलेली आग…

9 hours ago

नाशिक इगतपुरी तालुक्यात बालविवाह रोखण्यात यश

इगतपुरी तालुक्यात १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह (child marriage) रोखण्यात बाल आयोगाला यश(Success in…

10 hours ago

मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड मार्गावर बस-ट्रकचा भीषण अपघात

मुंबई आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra highway) चांदवड मार्गावर भीषण अपघाताची माहिती समोर आली आहे. अनेक जण…

10 hours ago

उन्हाळ्यात गूळ खाण्याचे फायदे

गुळामध्ये ( jaggery) व्हिटॅमिन बी 12, बी 6, लोह, खनिजे आणि जीवनसत्वे असतात. आपली रोगप्रतिकारक…

10 hours ago

पिंपळगाव येथे महिन्याभरात सुमारे तीन लाख क्विंटल कांद्याची उलाढाल ठप्प

एप्रिल महिन्यात पिंपळगाव बाजार समितीत सुमारे तीन लाख क्विंटल कांद्याचे (onions) आवक होत असते. महिन्याभरापासून…

10 hours ago