शिवसेनेते उभी फूट पडल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी शिवसेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ची पडती बाजू सांभाळत आक्रमकपणे बंडखोरांचा समाचार घेत आहेत. जे आमदार शिवसेना सोडून गेले त्यांनी राजीनामा द्यावा आणि निवडून येऊन दाखवावे असे आव्हान त्यांना देत आहेत, यावर आता राज्याचे कृषी मंत्री आणि सिल्लोडचे आमदार अब्दूल सत्तार यांनी प्रतिआव्हान देत म्हणाले, त्यांच्या एका नेत्याने वक्तव्य केले तुम्हाला दोन वर्षानंतर कळेल की निवडणूक काय असते. मी म्हणालो दोन वर्ष कशाला वाट बघायची आता ही माझे चॅलेंज आहे की, त्यांनी नाही दिला तरी मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली की आठवडाभराच्या आत राजीनामा देईन, असे देखील सत्तार म्हणाले.
यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार दुप्पट नुकसान भरपाई देईल, असा दिलासा देत म्हाणाले, ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे तो सरकारच्या मदतीपासून वंचित राहणार नाही. याबाबत मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली आहे. मी स्वतः अनेक जिल्ह्यांमध्ये जाऊन नुकसाग्रस्तांना भेट दिली. नुकसान झालेला एक ही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असे देखील सत्तार यांनी यावेळी सांगितले.
हे देखील वाचा :
CNG Crisis : पुढचे काही दिवस पुणेकरांना ‘सीएनजी’ नाही
यावेळी बोलताना सत्तार यांनी उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर देखील टीका केली. ठाकरे यांचा दौरा अडीच तासांचा होता. त्या अडीच तासांमध्ये ते २४ मिनिटेच शेतकऱ्यांच्या बांधावर होते, त्या २४ मिनिटांमध्ये ठाकरे यांना काय दिसले मला माहित नाही, आम्ही २४ दिवस शेतकऱ्यांच्या बांधावर होतो. ते मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या पण त्यांना आता शेतकऱ्यांची आठवण राहीली नाही, असे देखील ते यावेळी म्हणाले.
नियमाप्रमाणे महापालिका हद्दीतील एखाद्या इमारतीचे ३० वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान झाल्यास स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे आहे.…
गुन्हेगारी टोळीतील आठ आरोपींना बंदुकीने फायर करणे महागात पडले. या आरोपींना माेक्का (MCOCA) लावण्यात आला…
भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले…
याअंतर्गत स्वीप उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत नवीन नाशिक विभागात महिला बचत…
पालघर मधून एक धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आलीये. स्त्रियांवर आणि बालकांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ…
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सपाटून मार खाल्ला होता. अशातच अजितदादांच्या मागं…