सिंधुदुर्गच्या राजकारणात नारायण राणे कुटुंबिय व दीपक केसरकर यांच्यात विळ्या भोपळ्याचे नाते आहे. दोन्हीही गटातून एकमेकांवर सतत वार केले जातात. आतापर्यंत दोघेही परस्पर विरोधी भूमिका असलेल्या राजकीय पक्षांमध्ये कार्यरत होते. पण आता दोघेही सत्ताधारी पक्षांमध्ये आहेत. तरीही या दोन्ही गटांतून एकमेकांवर आरोप केले जात असतात. नितेश राणे यांना मंत्रीपद (Eknath Shinde cabinet Expansion) मिळेल अशी जोरदार चर्चा होती. याउलट दीपक केसरकर यांच्या मंत्रीपदाबद्दल काहीच चर्चा नव्हती. प्रत्यक्षात मात्र नेमके उलटेच झाल्याचे दिसून आले आहे. दीपक केसरकर यांना मंत्रीपद मिळाल्याने विद्यमान सरकारमध्ये केसरकर यांचे वजन वाढले आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्रीपद सुद्धा आता केसरकर यांनाच मिळण्याची चिन्हे आहेत.
हे सुद्धा वाचा
एकनाथ शिंदे गटाची तातडीची बैठक, मंत्रीमंडळ विस्ताराअगोदर नाराजीचा घोळ !
Pradeep Patwardhan passed away : ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन काळाच्या पडद्याआड
केसरकर यांना मिळाले कॅबिनेट मंत्रीपद
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शिवसेनेच्या कोट्यातील दीपक केसरकर राज्यमंत्री होते. परंतु उद्धव ठाकरे सरकारमध्ये केसरकर यांना मंत्रीपदाची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे ते नाराज होते. अशातच शिंदे यांनी बंडखोरी केली. थेट गुवाहाटीत दाखल होवून केसरकर यांनी शिंदे गटाची बाजू जोरदार लावून धरली होती. त्यामुळे त्यांना शिंदे गटाचे प्रवक्तेपद सुद्धा त्यांना मिळाले.
शिंदे गटाची बाजू सांभाळताना केसरकर उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्याविषयी अनेकदा सहानुभूती सुद्धा व्यक्त केली होती. केसरकर यांनी तीन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेवून राणे कुटुंबियांवर तोफ डागली होती. राणे कुटुंबियांनी आदित्य ठाकरे यांची खोटी बदनामी केल्याचा आरोप केसरकर यांनी केला होता. त्यानंतर निलेश राणे यांनी केसरकर यांना वाहन चालकांची नोकरी देवू केली होती. तसे कुत्सित ट्विट निलेश राणे यांनी केले होते. पण प्रत्यक्षात मात्र केसरकर यांना मंत्रीपद मिळाले आहे.
अयोध्या येथील श्रीरामजन्म भूमी न्यासाचे खजिनदार आणि जगभरात गीतेचा प्रसार करणारे स्वामी गोविंददेवगिरी महाराज (Swami…
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. (Arvind Kejriwal has…
फेब्रुवारी महिन्यात राज्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बस स्टॅन्डचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले.…
हेमंत करकरे यांची हत्या अजमल कसाब ने केली नाही असे म्हणणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार…
'मदत फाऊंडेशन’ (Help Foundation) च्यावतीने अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. पाण्याअभावी पक्ष्यांचा मृत्यू होऊ नये,…
लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पार पडले. चौथ्या आणि पाचव्या टप्प्याच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली…