टीम लय भारी
आदरणीय मलिकसाहेब ,
सलाम वालेकुम ! नमस्कार !! जय भीम !!!
साहेब , सध्या आपण नॅशनल हिरो आहात . भारतातील सर्वात जास्त टीआरपी असणारे नेते आहात . आर्यनखान प्रकरणापासून सुरू झालेला आपला प्रवास दिवसेंदिवस आपल्या व्यक्तिमत्त्वातील वेगवेगळे पैलू उलगडून दाखवीत आहे(Nawab Malik: Hero of the country)
बलाढ्य केंद्र सरकारशी पंगा घेणे ही कोण्या येड्यागबाळ्याचे काम नाही . तिथे लागतात जातीचेच .
निर्बंध शिथिल होत असताना राज्य सरकारकडून नवा आदेश जारी
Bank Holiday in December 2021: डिसेंबरमध्ये 12 दिवस बंद राहणार बँका, पाहा सुट्ट्यांची संपूर्ण लिस्ट
उत्कृष्ठ शोध पत्रकार
उत्कृष्ट शोध पत्रकारिता करणारा पत्रकार कसा असावा याचे उदाहरण आपल्याकडे पाहिल्यावर दिसून येते . दररोज नवनवीन माहितीचा खजिना दाखवीत असताना आपण ती माहिती कुठून आणली असेल ? ती कागदपत्रे कशी मिळवली असतील ? याचा विचार केल्यावर आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेला आपल्याप्रती आदरयुक्त कुतूहल वाटते .
सध्याच्या काळातील पत्रकारितेचे होत असलेले प्रचंड अवमूल्यन पाहता आपण करीत असलेली शोध पत्रकारिता प्रचंड उच्च दर्जाची आहे . जे काम पत्रकारांनी निष्ठेने करायला पाहिजे होते ते काम आपण कितीतरी प्रामाणिकपणे करीत आहात . या वर्षीचा उत्कृष्ट शोध पत्रकारितेचा पुरस्कार आपल्यालाच मिळावा .
क्रडिट कार्ड वापरत असला तर ही बातमी वाचाच, कारण…
हा पुरस्कार देणाऱ्या संस्थांनी याचा गांभीर्यपूर्वक विचार करावा . व्यवसायाने पत्रकार नसलेला परंतु उत्कृष्ट शोध पत्रकारिता करणारा व्यक्ति म्हणून आपल्याला पुरस्कार देऊन त्यांनी वेगळा पायंडा पाडावा .
संयम ….
आपण पत्रकार परिषदेत दाखवीत असलेला संयम कितीतरी उच्च प्रतीचा आहे . जो संयम भल्याभल्यांना जमत नाही तो आपल्या व्यक्तिमत्त्वात सहज दिसून येतो . अतिशय शांत पद्धतीने आपण सर्वांना समजावून सांगत असता . कुठेही आक्रस्ताळेपणा नाही . तुमच्या बोलण्यात कुठेही संदीप पात्रा अथवा केशव उपाध्ये दिसत नाही . आपली बाजू ठामपणे आणि तितक्याच संयमितपणे आपण मांडताना दिसता .
बिनतोड वकिली युक्तिवाद …..
आपण पत्रकार परिषदेत जे मुद्दे उपस्थित करता त्या मुद्द्यांवर तथाकथित पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना आपण दिलेले उत्तर म्हणजे एका उत्कृष्ट वकिलाने केलेला बिनतोड युक्तिवाद वाटतो . एखाद्या राजकीय पक्षाचा प्रवक्ता कसा असावा तर नवाब मालिक सारखा असावा .
आणि प्रवक्ता कसा नसावा हे संदीप पात्राकडे पाहून ठरविता येते . एखाद्या घटनेवर आपण देत असलेले पक्षाचे मत इतके ठाम आणि स्पष्ट असते की दुसरा प्रश्न विचारण्याची गरजच नसते . परंतु पत्रकारांना कशीतरी वेळ घालवायची असते म्हणून ते उगाचच फिरून फिरून प्रश्न विचारतात .
नबाबी संस्कार ….
आपल्याला भंगारवाला म्हणून हिणवले गेले . संस्कृतीचा टेंभा मिरविणाऱ्या एका पेशव्याने आपल्याला डुक्कर संबोधून त्यांचे उच्च प्रतीचे संस्कार दाखवून दिले . परंतु आपण आपला तोल जरा सुद्धा ढळू दिला नाही . यालाच उच्च प्रतीचे नबाबी संस्कार म्हटले तर वावगे ठरू नये .
मुसलमान आहात म्हणून विरोध
साहेब ,आपण मुसलमान असल्यानेच ही मंडळी आपल्यावर खार खाऊन आहे .सध्याच्या भारतीय मानसिकतेनुसार मुसलमानाने किती ही मोठे काम करू देत , ते कितीही हुशार असू देत , त्याला अनुल्लेखाने मारले जाते . सर्वसामान्य जनतेच्या मनात मुसलमाना विरोधात बीज पेरली जात असल्याने आपल्या हुशारीला मनात असूनही दाद देणारे कमीच आहेत .
त्या तथाकथित संस्कृती रक्षकांना माहित नाही की आपण एक मुसलमान असून सुद्धा मुसलमानाचाच पर्दाफाश करीत आहात .आपण भारतीय असल्याचा तोच सर्वात मोठा पुरावा आहे .
फडणवीसांचा पळपुटेपणा
आपण केलेल्या आरोपांना उत्तर देताना एन . सी . बी . आणि फडणवीसांच्या नाकीनऊ आले आहे . आपण फडणवीस पतीपत्नीवर केलेले आरोप त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील अतिशय गंभीर असे आहेत . त्यामुळे ते सुमडीत गप्प बसले . आपल्या अंगावर आल्यावर कसे साळसुदपणे शांत रहावे हे पेशव्यांकडूनच शिकावे .
आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडेसारख्या तथाकथित दबंग अधिकाऱ्याकडे तपासासाठी असलेला तो गुन्हा काढून घेण्यात आला हाच आपला सर्वात मोठा विजय आहे . परंतु त्याचे महत्त्व कळून सुद्धा या गोदी बिकाऊ मीडीयाने आपल्या सारख्या नेत्याला त्याचे क्रेडिट दिले नाही . त्यांना त्यांच्या या अपयशाची लाज वाटली .
समस्त भारतीय मुस्लिमांचा राजकीय चेहरा
साहेब आपण लढत असलेल्या लढाईचे महत्व आपल्या व्यक्तिगत जीवनात सुद्धा फार मोठे आहे . आपण एक निडर , हुशार , संयमी नेता म्हणून देशासमोर येत आहात .
देशभरातील मुस्लिमांचे आपण आशास्थान होत आहात . भाजपाची बी टीम ओवेसी यांची जागा हलताना दिसत आहे . साहेब आपली जागा लोकसभेत व राज्यसभेत तयार झालेली आहे याची आपण नोंद घ्यावी .
झेड सिक्युरिटी देण्यात यावी ….
आपण उघड करीत असलेली प्रकरणे आणि केंद्रीय संस्थांना आणि केंद्र सरकारला आपण देत असलेली आव्हाने पाहता आपल्या जीवाला धोका असल्याचे लक्षात येते . म्हणून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमची नम्र विनंती आहे की आपल्याला तात्काळ झेड प्लस दर्जाची सुरक्षितता देण्यात यावी . आपल्यासारख्या मराठी नेत्याला संरक्षण द्यावे .
सरकार म्हणून ठामपणे पाठीशी उभे राहावे
सरकारमधील तीनही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नवाब भाईच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे . मालिकांच्या प्रत्येक पत्रकार परिषदेत दोन दोन मंत्री स्वतःहून हजर राहिले पाहिजे .
सरकरकडून दाखविण्यात येणारी एकीच तुम्हा सर्वांना वाचवू शकेल . नबाब हा एकटा नाही तर आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत हा खणखणीत संदेश केंद्राला जाणे फार आवश्यक आहे .
मराठी मुसलमान
या तथाकथित मराठी पेशवाईपेक्षा आपण मराठी मुसलमान आमच्यासाठी केव्हाही अभिमानास्पद आहात . महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अंतुलेसारख्या मराठी मुसलमानाला संपूर्ण महाराष्ट्र आपला मानतो . श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा आवडता मुख्यमंत्री अंतुलेसाहेब होते यावरून आपल्या लक्षात येईल .
संविधानाचे खरे पाईक
नवाबभाई आपण संविधानाचे खरे पाईक आहात . संविधानाने दिलेल्या ” राइट टू स्पीक ” या अधिकाराचे आपण तंतोतंत पालन करीत आहात .
आपल्या उज्वल भविष्यासाठी आणि खासदारकीसाठी आपल्याला मनःपूर्वक शुभेच्छा .
आपला चाहता ,
ऍड . विश्वास काश्यप ,
अध्यक्ष , मी बुद्धिस्ट फाउंडेशन ,
माजी पोलीस अधिकारी .