टीम लय भारी
मुंबई:- भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून होत असलेले आरोप आणि शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीकडून झालेली अटक यावर संजय राऊतांनी संताप व्यक्त केला आहे.(Shiv Sena’s terror in Mumbai Sanjay Raut scuffle against ED)
शिवसेना मारहाणी प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून होत असलेले आरोप यामुळे संजय राऊतांनी ईडीविरुद्ध संताप व्यक्त केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून आमच्यावर खोटेनाटे आरोप केले जात आहेत. नुसतं बदनाम करण्याचं काम सध्या किरीट सोमय्यांचं सुरु आहे. तुमची दादागिरी इथे मुंबईत खपवली जाणार नाही.
हे सुद्धा वाचा
धक्कादायक : मुख्यमंत्र्यांचे उपसचिव अनिष परशुरामे यांचे निधन
संजय राऊत यांनी व्यंकय्या नायडूंना लिहिले पत्र, म्हणाले…
गोव्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल, संजय राऊत
“Asked By ‘Bosses’ To ‘Fix’ Me”: Sena’s Sanjay Raut’s Sensational Charge
लक्षात ठेवा, मुंबईत शिवसेनाच दादा आहे. आम्हीच मुंबईत दादागिरी करणार आहोत, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी ईडीवरही चांगलाच हल्ला चढवला आहे. ईडीला देखील चांगलेच वेशीवर टांगले आहे. सर्वाधिक खटले महाराष्ट्रातच कसे? यूपी, बिहार आणि दिल्लीत कसे नाहीत?अरे हा ना ठाकरे सरकार पाडण्याचा डाव आहे.
असे राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत म्हंटले. अनिल देशमुखांच्या शेजारील कोठडीत जावं लागेल असं भाजप नेते वारंवार सांगत आहे. मी त्यांना सांगतो, तुम्हाला देखील तिथेच जावं लागेल. तुमची पापं जास्त आहेत. आम्ही शुद्ध आहोत.
हा एकमात्र सरकार पडण्याचा कट आहे. ईडीच्या कार्यालयात काय चाललंय? याचे सूत्रधार कोण आहेत? हे लवकरच मी तुम्हाला सांगेन, असं सांगतानाच तुम्ही मुंबईत दादागिरी करता, महाराष्ट्रातील लोकांना बाहेरची लोकं सुपाऱ्या घेऊन येतात. 12-12 तास डांबून ठेवतात. धमक्या देतात. मुंबई पोलिसांनी याच्यावर कारवाई करावी असं माझं आवाहन आहे, असंही राऊत म्हणाले.