राजकीय

निवडणूक आयोग मोदींचा गुलाम ; उद्धव ठाकरेंचा घणाघात

निवडणूक अयोग्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुलाम आहे आहे. त्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे, अशी जहरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. या निर्णयाविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे ते म्हणाले. आमचा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाकडे याविरोधात दाद मागणार आहोत. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे. जोवर एकनाथ शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण होत नाही, तोवर धनुष्य बाण या चिन्हावर निवडणूक आयोगाने आपला निर्णय राखून ठेवावा, असा युक्तिवाद आम्ही न्यायालयात केला होता, असे उद्धव ठाकरे म्हणाले. (Election Commission Modi’s slave; Uddhav Thackeray’s death)

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, येत्या काही महिन्यांत मुबई महानगरपालिकेच्या निवडणूका जाहीर होतील, अशी आम्ही अपेक्षा करतो. निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय आमच्यासाठी अनपेक्षित होता. पंमुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे. आता लवकरच ते निवडणूक घोषित करतील, असे ठाकरे म्हणाले. हा सर्व घटनाक्रम म्हणजे सुनियोजित कट असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. एकनाथ शिंदे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते धनुष्य बाण हे चिन्ह त्यांना मिळेल, असे पूर्वीपासूनच सांगत आले आहेत. मुंबईचे नियंत्रण दिल्लीश्वरांच्या हातात असावे, अशीच त्यांची इच्छा आहे. महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे गटाचे मशाल हे चिन्हदेखील त्यांना मिळाले तर आश्चर्य वाटणार नाही, अशा बोचऱ्या शब्दांत ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला आहे. निवडणूक आयोगाने शेण खाल्ले आहे. एखाद्या राजकीय पक्षाची वैधता निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या आधारावर कशी काय ठरवता येऊ शकते. हे असेच जर असेल तर लोकप्रतिनिधींना विकत घेतले जाऊ शकते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीबाहेर ओपन कारमधून भाषण

टी. एन. शेषन : निवडणूक आयोगाला बळकट करणारा वाघ !

चोरीचे धनुष्य बाण घेऊन निवडणुकीला सामोरे या..! उद्धव ठाकरेंचे एकनाथ शिंदेंना आव्हान

टीम लय भारी

Recent Posts

नरेंद्र मोदी फेकाडे, इंदिरा गांधी कर्तृत्ववान

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश…

1 hour ago

मराठी माणसांनो, चालते व्हा; मुंबई गुजरात्यांसाठी खाली करा

   मुंबई आता मराठी माणसांची राहिलेली नाही. म्हणून मराठी माणसांनो तुम्ही मुंबईतील तुमची घरं विका.…

2 hours ago

गुगलची मेहरबानी, ‘लय भारी’ची प्रगती !

‘गुगल’ने आज ‘लय भारी’ला विशेष प्रमाणपत्र प्रदान केले आहे. असे प्रमाणपत्र मिळवणारे ‘लय भारी न्यूज’…

4 hours ago

मतदान जनजागृतीसाठी नाशिक मनपातर्फे चित्रकला व मेहंदी स्पर्धेचे आयोजन

नाशिक महापालिका (NMC) व क्रेडाई यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या बुधवारी (दि.8) शहरातील गोल्फ क्लब येथे…

7 hours ago

नो-पार्किंग’मधील वाहनांकडे ‘कानाडोळा’! सोयीनुसार वाहनांची टोईंग

शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये गेल्या आठवडाभरापासून वाहनांच्या टोईंगची (Towing) कारवाई सुरू झालेली आहे. मात्र असे…

7 hours ago

रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढल्या; EVM मशीनची केली पूजा; दाखल झाला गुन्हा

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी ईव्हीएम मशीनची पूजा (worship of EVM…

7 hours ago