एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड पुकारून सोबत 40 आणि नंतर 50 आमदारांना एकत्र घेत भाजपशी हातमिळवणी करून राज्याचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर त्यांनी खरी शिवसेना आपली असल्याचा दावा त्यांनी केला. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या नाव आणि चिन्हावरून लढा सुरू होता. मात्र निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचे नाव आणि चिन्ह दोन्ही दिल्याने उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. त्याचवेळी कंगना राणौतचे या मुद्द्यावरचे ट्विट आता चर्चेचा विषय ठरत आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतच्या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कंगना रणौतने ट्विटमध्ये लिहिले आहे की, “देवांचा राजा म्हणजेच इंद्रलाही गैरवर्तन केल्यावर शिक्षा मिळते. तो फक्त एक नेता आहे. जेव्हा त्याने माझे घर तोडले, तेव्हा मला वाटले त्याचे वाईट दिवस सुरू होतील. एका महिलेचा देव अपमान करणाऱ्यांना शिक्षा देतो. पुन्हा कधीही उठणार नाही.” असे म्हणत कंगनाने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कंगनाच्या घराचा काही भाग पाडला होता. त्यावेळीही कंगना उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाली होती, ‘आज माझे घर तुटले, उद्या तुझा अभिमान तुटेल.’ अशा भावना तिने त्यावेळी व्यक्त केल्या होत्या.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या एका निर्णयाने महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ आलं आहे. उद्धव ठाकरेंना मोठा धक्का लागला आहे. दरम्यान, या निर्णयावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मातोश्रीबाहेर मोठी गर्दी करत जोरदार घोषणाबाजी केली. त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात निदर्शने केली. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाहेर येऊन कार्यकर्त्यांची भेट घेतली.
हे सुद्धा वाचा : उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीबाहेर ओपन कारमधून भाषण
निवडणूक आयोग मोदींचे गुलाम ; उद्धव ठाकरेंचा घणाघात
चोरीचे धनुष्य बाण घेऊन निवडणुकीला सामोरे या..! उद्धव ठाकरेंचे एकनाथ शिंदेंना आव्हान
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. (Arvind Kejriwal has…
फेब्रुवारी महिन्यात राज्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बस स्टॅन्डचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले.…
हेमंत करकरे यांची हत्या अजमल कसाब ने केली नाही असे म्हणणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार…
'मदत फाऊंडेशन’ (Help Foundation) च्यावतीने अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. पाण्याअभावी पक्ष्यांचा मृत्यू होऊ नये,…
लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पार पडले. चौथ्या आणि पाचव्या टप्प्याच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली…
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) भाजपचे प्रचारक बनून ४०० पारच्या घोषणा ('400 par' slogans) देत…