33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयअहो गोपीचंद पडळकर, आम्ही भंगार विकतो; पण तुमच्या नेत्यांनी तर देश विकायला...

अहो गोपीचंद पडळकर, आम्ही भंगार विकतो; पण तुमच्या नेत्यांनी तर देश विकायला काढला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज राजापूरकरांचे टीकास्त्र

टीम लय भारी

मुंबई : आमचे नेते नवाब मलिक पूर्वी भंगार विकायचे. तो त्यांचा व्यवसाय होता. पोटापाण्यासाठी ते हा व्यवसाय करीत होते. त्यांचा आम्हाला अभिमान आहे. पण केंद्रातील तुमच्या नेत्यांनी तर देश विकायला काढला आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस राज राजापूरकर यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर तोफ डागली आहे. ( gopichand padalkar addressed by raj rajapurkar )

अंमली पदार्थ प्रकरणी नवाब मलिक हे एनसीबीचा दररोज भंडाफोड करीत आहेत. नवाब मलिक नियमितपणे भाजप व एनसीबीचा खोटारडा चेहरा जनतेसमोर आणत आहेत. त्यामुळे भाजपचे नेते बावचळले आहेत. आपले पितळ उघडे पडू नये म्हणून ते सारवासारव करीत आहेत.

‘रावणाला मदत करणारी शुर्पणखा’

एनसीबीला तंबाखू आणि गांजामध्ये फरक कळत नाही, नवाब मालिकांची टीका

‘उचलली जीभ लावली टाळ्या’ला हा गुणधर्म जोपासणारे गोपीचंद पडळकर यांनीही नेहमीच्या आपल्या खोडसाळ स्वभावानुसार मलिक यांच्यावर खालच्या पातळीवर जावून टीका केली होती. त्याला राजापूरकर यांनी सणसणीत प्रत्यूत्तर दिले आहे.
राजापूरकर यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे. त्यात ते म्हणतात की, अरे गोपीचंद; नवाब मलिक भंगार विकायचे. पण तुझा बाप पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देश विकत आहेत. जनाची नसेल तर मनाची तरी शरम कर. नवाब मलिक हे भंगारचा व्यवसाय पोटापाण्यासाठी करीत होते. गरीबीचा तुम्ही अपमान करीत आहात.

एलआयसी, शिपींग कार्पोरेशन ऑफ इंडिया, पेट्रोलियम कंपन्या, रेल्वे, टपाल खाते असे केंद्र सरकारचे सगळे उद्योग नरेंद्र मोदी यांनी विकायला काढल्याचा आरोप राजापूरकर यांनी केला आहे.

भाजप – एनसीबीचा खोटेपणा
नवाब मलिक यांच्या जावयाला काही महिन्यांपूर्वी एनसीबीने अटक केली होती. त्यांच्याकडे २०० किलो गांजा सापडल्याचा आरोप होता. वास्तवात मात्र त्यांच्या जावयाकडे कुठल्याही प्रकारचा गांजा सापडलेला नाही. न्यायालयासमोरच हे तथ्य समोर आले आहे. त्यामुळे केंद्रीय संस्थांचा दुरूपयोग करून भाजप विरोधी पक्षांवर कारवाई करीत असल्याचाही आरोप राजापूरकर यांनी केला आहे.
आयकर विभाग, ईडी, एनसीबी, सीबीआय अशा संस्थांमधील अधिकाऱ्यांकरवी केंद्रातील मोदी सरकार विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या विरोधात बनाव रचत आहे. धाडी, तपासणी यांच्या नावाखाली विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्रास द्यायचा उद्योग मोदी सरकार करीत असल्याचा आरोप राजापूरकर यांनी केला आहे.

नवाब मलिक भाजपचे सतत पितळ उघडे पाडत असतात. त्यामुळेच त्यांच्या जावयाला अडकविण्याचा भाजपाचा प्रयत्न होता. परंतु भाजप व एनसीबी तोंड फुटेपर्यंत थोबाडावर आपटले असल्याचे राजापूरकरांनी म्हटले आहे.

टाटा मेमोरियल सोबत एसएमबीटीचा सहयोग करार

‘मोदींनी सहकार क्षेत्रातील कीड साफ करायचं ठरवलंय हेच यांचं दु:ख आहे’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी