28 C
Mumbai
Monday, September 23, 2024
Homeमहाराष्ट्रनारायण राणेंच्या 'पनवतीने' फडणवीस सरकार बुडाले

नारायण राणेंच्या ‘पनवतीने’ फडणवीस सरकार बुडाले

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : भाजपने सत्तास्थापनेच्या लढाईतून माघार घेतल्यानंतर शिवसेनेकडून ‘ऑपरेशन देवेंद्र’मधील शिलेदार नारायण राणे यांच्यावर सडकून टीका करण्यात आली आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी ट्विट करून राणेंना लक्ष्य केले. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, अखेर मा. नारायण राणे यांच्या पनवतीने देवेंद्र फडणवीस बुडाले. आता नारायण राणे यांनी गणिताचा अभ्यास करत बसावे, अशी खोचक टिप्पणी विनायक राऊत यांनी केली.

भाजप नेते नारायण राणे यांनी सोमवारी महाविकासआघाडीकडे बहुमताइतके संख्याबळ नसल्याचा दावा केला होता. ग्रँड हयातमध्ये पार पडलेल्या महाविकासआघाडीच्या ओळख परेडला १३७ आमदारच उपस्थित होते. एवढेच नव्हे तर या १३७ आमदारांमध्येही विधान परिषदेच्या अनेक आमदारांचा भरणा होता, असा दावाही राणे यांनी केला होता. तसेच उद्धव ठाकरे मातोश्रीवर रोजच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असतात, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली होती. त्यामुळे भाजप सभागृहात बहुमत सिद्ध करून दाखवेल, अशा वल्गनाही नारायण राणे यांनी केल्या होत्या. मात्र, नारायण राणे यांचा हा दावा सपशेल फोल ठरला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी