टीम लय भारी
मुंबई : ‘या देशातील लोक निर्लज्ज आहेत’ असे संतापजनक विधान संभाजी भिडे यांनी केले आहे. भिडे यांनी माफी मागून हे विधान तात्काळ मागे घ्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस राज राजापूरकर यांनी दिला आहे. (raj rajapurkar talking about sambhaji bhide’s statement)
या देशाच्या मातीने अनेक छत्रपती, क्रांतीवीर, शूरवीर घडविले आहेत. परंतु संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य करून अशा महापुरूषांचा अपमान केला आहे. त्यामुळे भिडे यांनी हिंदुस्थानची, महाराष्ट्राची व या मातीची माफी मागावी, असे ट्विट राजापूरकर यांनी केले आहे.
ड्रग्स विक्रेत्यांना अटक, 21 लाख किमतीची ड्रग्स जप्त
मंदिरे उघडली आणि भाजपचा चेहरा चव्हाट्यावर आला
भिडे यांच्या पाठिराख्यांनी भिडे यांना माफी मागण्याचा सल्ला द्यावा, अन्यथा भिडे यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असेही राजापूरकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.