लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : भाजपकडे सत्तास्थापन करण्याइतपत संख्याबळ नसल्यामुळे भाजपने सत्तास्थापन करण्यास नकार दिला, त्यानंतर राज्यपालांनी संख्याबळात दुस-या क्रमांकाचा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्तास्थापन करण्यासाठी निमंत्रण दिलं आहे.
शिवसेनेला निमंत्रण दिल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना फोन केला असून ते पवारांच्या निवासस्थानी भेटीसाठी जाणार आहेत. आजच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांच्या भेट घेतली त्यानंतर भाजप सत्तास्थापन करणार नाही असं जाहीर केलं. त्यामुळे आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस सरकार स्थापन करणार असल्याचे जवळपास निश्चित आहेत. त्यामुळे पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.