28 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्र'महामंडळाच्या नियुक्त्या जाहीर करा'

‘महामंडळाच्या नियुक्त्या जाहीर करा’

टीम लय भारी

मुंबई :-  महाविकास आघाडी सरकारने सत्ता स्थापन करून १३ महिन्याहून अधिक काळ होऊन गेला आहे, तरी देखील एस.ई.ओ पदाच्या नियुकत्या जाहीर केलेल्या नाहीत. त्यामुळे एस.ई.ओ आणि महामंडळ वरील नियुक्त्या त्वरित करण्यात याव्यात यासाठी मुंबई काँग्रेसचे सचिव धनंजय जुन्नरकर यांनी महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना निवेदन दिले आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशियारी हे जोपर्यंत पदावर आहेत. तोपर्यंत राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या पत्रावर सही करतील अशी शक्यता दिसत नाही असे जुन्नरकर म्हणाले. सध्या राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारचे संबंध पाहता तिन्ही पक्षांनी शिफारस केलेल्या नेत्यांची वर्णी सहजासहजी लागणे दुरापास्त वाटत आहे. त्यांना पत्र देऊन आणि पद रिक्त राहून एक वर्ष व्हायला आले आहे.

महाराष्ट्रात तीन पक्षाची सत्ता असून त्यात काँग्रेसला सर्वात कमी वाटा मिळालेला आहे. येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीआधी कार्यकर्त्यांना न्याय मिळावा जोश निर्माण व्हावा हे अत्यंत गरजेचे आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांना मागील सहा-सात वर्षांत कोणतीही शासकीय पद मिळालेले नाही. कार्यकर्ते ही पक्षाची ताकद असतात सर्वांनाच पक्ष तिकीट देऊ शकत नाही. अशा वेळी चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना वरिष्ठ पदाधिकारी यांना न्याय देण्याची गरज आहे असे प्रतिपादन ही धनंजय जुन्नरकर यांनी केली आहे.

महाराष्ट्र शासनाकडे ४० महामंडळे आहेत या ३५० ते ४०० वरिष्ठ पदाधिकारी आणि एस.ई.ओ. च्या माध्यमातून महाराष्ट्रात हजारो कार्यकर्त्यांना न्याय देता येईल. तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते जोशात काम करू लागतील आणि कार्यकर्त्यांना देखील न्याय मिळेल. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांसाठी ज्यांची नावे गेली आहेत त्या नावांना महामंडळात सामील करून घेतल्यास त्यांच्यावर देखील अन्याय होणार नाही, असेही धनंजय जुन्नरकर म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी