टीम लय भारी
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ ( Atmanirbhar Bharat ) मोहिमेअंतर्गत २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. पण यांत मागासवर्गीयांसाठी काहीही जाहीर केले नसल्याचा आरोप आमदार प्रकाश गजभिये यांनी केला आहे.
गरीब मागासवर्गीयांनी थाळी वाजवूनही मोदी यांनी ती रिकामी ठेवली आहे. भाजप सरकारने अगोदरच मागासवर्गीयांचे आरक्षण संपविण्याची कारस्थाने सुरू केली आहेत. आता २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमध्येही ( Atmanirbhar Bharat ) मागासवर्गीयांना अलिप्त ठेवण्यात आल्याचे गजभिये यांनी म्हटले आहे.
मोदी यांनी तंबी दिल्यामुळे रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी १.७५ लाख कोटी रुपये केंद्राला दिले होते. संकटकाळात वापरायचा हा निधी मोदी यांनी अगोदरच संपवून टाकला. हा निधी आताच्या ‘कोरोना’ संकटकाळात उपयोगी पडला असता.
सध्या दहा कोटी रुपये मजूर रस्त्यावर आहेत. लॉकडाऊनमुळे ते गावाकडे जात आहेत. त्यांना खायला अन्न नाही. गोरगरीब शेतकऱ्यांच्या कुटुंबांबद्दलही मोदी सरकारने पॅकेजमध्ये फार काही दिलेले नाही.
करोडपती व्यापाऱ्यांची काळजी २० लाख कोटीच्या पॅकेजमध्ये ( Atmanirbhar Bharat ) घेतल्याचे दिसत आहे. ज्या व्यापाऱ्यांनी देश लुटला त्यांच्यासाठीच गोरगरीबांचा पैसा मोदी सरकार देत असल्याचा आरोप गजभिये यांनी केला आहे.
महाराष्ट्राला किती निधी देणार याबाबतही संदिग्धता
केंद्राने जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपये निधीपैकी महाराष्ट्राला किती मिळणार याबाबत पंतप्रधान व अर्थमंत्र्यांनी काहीही स्पष्ट केलेले नाही. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. कररुपाने मुंबई केंद्र सरकारला भक्कळ निधी देत असते.
‘कोरोना’मुळे सध्या महाराष्ट्र व मुंबई अडचणीत आहे. त्यामुळे केंद्राने महाराष्ट्र व मुंबईला भरघोस मदत करायला हवी. रूग्णसंख्येच्या प्रमाणात मुंबई व महाराष्ट्राला निधी द्यायला हवा. पण मोदी सरकार महाराष्ट्राला नेहमी दुय्यम स्थान देत असते. जास्तीत जास्त निधी ते गुजरातला वळवत असतात. २० लाख कोटीच्या पॅकेजमध्येही असेच गौडबंगाल असू शकेल, असेही गजभिये म्हणाले.
हे सुद्धा वाचा
Yashwant Sinha : नरेंद्र मोदींच्या गळ्यातील ‘गमछा’ आता जागतिक फॅशन होईल
Politics In BJP : राम शिंदेंचा पंकजाताई, चंद्रकांतदादांवर निशाणा
Memes about being ‘Atmanirbhar’ flood social media after PM Modi’s latest speech