टीम लय भारी
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त भारतीय स्वातंत्र्य संग्रामात ज्या वीरांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता आपले बलिदान दिले. अशा वीरांना विनम्र अभिवादन केले आहे. कोरोनाला हरवण्यासाठी आपण सर्वांनी प्रतिज्ञा घेऊया आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा आनंद द्विगुणित करूया असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे (The Chief Minister has appealed to double the joy of the nectar festival of Indian independence).
मुंबईतील गवालिया टँकवर ‘करेंगे या मरेंगे’ अशी प्रतिज्ञा घेत ब्रिटिशांना ‘ चले जाव…! भारत छोडो!’ असा निकराचा शब्द देण्यात आला. या संग्रामात ज्या क्रांतिकारी, स्वातंत्र्यसैनिकांनी प्राणांची आहुती दिली त्या वीरांना आपण विनम्र अभिवादन करूया. या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपण आपले घर-कुटुंब, परिसर, वाडी-वस्ती, गाव-शहर कोरोनामुक्त करण्याची प्रतिज्ञा घेऊया. असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले.
जागतिक आदिवासी दिना निमित्त विधानसभा उपाध्यक्षांचा खास कार्यक्रम
मंत्रालयातील अधिकाऱ्यांना हवीत ‘मलईदार’ पदे, वशिल्यासाठी पुढाऱ्यांच्या शिफारसपत्रांचा खच
देशभरात 9 ऑगस्ट हा दिवस क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारतीयांना मुक्त करण्यासाठी ज्या भारतीयांनी आपले बलिदान दिले. अशा वीरांना अभिवादन करण्यासाठी क्रांती दिवस साजरा केला जातो (Revolution Day is celebrated to greet such heroes).
मनसेने मानले मुख्यमंत्र्यांचे आभार!
Mumbai University: MCQ pattern helps improve pass rate, 97.5% clear TYBCom