PM : पाकिस्तानात जन्मलेले भारताचे पंतप्रधान

विनम्र स्वभाव, प्रचंड अभ्यासू, अर्थतज्ञ असलेले भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा आज वाढदिवस आहे. डॉ. मनमोह‍न सिंग हे भारताचे 14 पंतप्रधान (PM) होते. ते एक विचारवंत तसेच अर्थतज्ञ आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचा जन्म 16 सप्टेंबर 1932 रोजी अखंड भारताच्या पंजाब प्रांतामध्ये झाला. ते खेडेगावात जन्माला आले. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचा जन्म पंजाबमधील गोह नावाच्या गावात झाला. आज तो भाग पाकिस्तानमध्ये आहे. त्यांनी 1948 मध्ये पंजाब विद्यापीठातून पदवी घेतली. त्यानंतर पुढील शिक्षण त्यांनी केंम्ब्रिज विद्यापीठात घेतले. 1957 मध्ये त्यांनी केंम्ब्रिज विद्यापीठात अर्थशास्त्राची पदवी घेतली. 1962 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदवी घेतली. त्यांनी अर्थशास्त्रावर काही पुस्तके लिह‍िली आहेत.

त्यापैकी इंडियाज एक्सपोर्ट ट्रेंडस ॲण्ड प्रॉसस्पेक्टस फॉर सेल्फ सटेन्ड ग्रोथ हे पुस्तक भारताच्या व्यापाराची समीक्षा करणारे आहे. ते पंजाब विद्यापीठामध्ये प्राध्यापकाचे काम करत होते. मनमोहन सिंग 1987-1990 या काळात जीनिव्हा येथे साऊथ किमिशनचे सरचिटणीस होते. तर 1971मध्ये वाण‍िज्य मंत्रालयात सल्लागार म्हणून काम केले. मनमोहन सिंह यांनी अर्थमंत्रालयात अनेक पदे भूषवली. सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, रिझर्व बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे प्रमुख सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षपद त्यांनी पंतप्रधान होण्याच्या आधी भूषवले. 1991 ते 1996 या काळात ते भारताचे अर्थ मंत्री होते.

हे सुद्धा वाचा

Sonia Gandhi : सोन‍िया गांधींची डोकेदुखी वाढली

Shinde government : शिंदे सरकारने काढला गरीबांच्या तोंडातला घास

Narayan Rane Bungalow Demolition: नारायण राणेंच्या बंगल्यावर पुन्हा ‘बुलडोजर!’ सुप्रीम कोर्टाने दिले आदेश

भारताच्या आर्थिक सुधारणांमध्ये त्यांची महत्त्वाची भूमीका आहे.त्यांना 1987 मध्ये पद्मविभूषण ,1995 मध्ये जन्म शताब्दी सन्मान, 1993-1994 मध्ये अशिया मनी ॲवार्ड पुरस्कार त्यांना मिळाले. 1957 मध्ये केंम्ब्रीज विद्यापीठाचा राईट पुरस्कार असे अनेक नावाजलेले पुरस्कार त्यांना मिळाले. डाँ. मनमोहन सिंग यांनी अनेक अंतरराष्ट्रीय परिषदा आणि संघटनांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्त्व केले. 1993 मध्ये त्यांनी व्ह‍िएन्ना येथे मानवाधिकार बैठकीमध्ये भारताचे प्रतिनिधीत्त्व केले. 1991 पासून ते राज्यसभेवर निवडून गेले. 1998-2004 राज्यसभेत विरोधी पक्ष नेते पद भूषवली. 22 मे 2004 मध्ये ते देशाचे पंतप्रधान झाले. त्यानंतर पुन्हा 22 मे 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये ते दुसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाले.

भारताच्या इतिहासात ते उदारनितीचे असल्याची ओळख त्यांनी निर्माण केली.त्यांच्या घरची परिस्थ‍िती फार हालाखीची होती. त्यांच्या आई-वडीलांचे निधन लहानपणीच झाले त्यानंतर त्यांच्या आजीने त्यांचा सांभाळ केला. अम्रतसरमधील आटेवाली गल्लीमध्ये आली.भारताच्या अर्थशास्त्रामध्ये त्यांच्या नितीला अनन्य साधारण महत्त्व आहे. कारण कर्जात बुडालेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला त्यांनी नवसंजीवनी दिली. जागत‍िक व्यापारासाठी बंद केलेले दरवाजे त्यांनी उघडले.

रूपाली केळस्कर

Recent Posts

नाशिक जळगाव जिल्ह्यातील आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण

भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे घरात झोपलेल्या आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण (baby abducted) झाल्यानंतर काही दिवसांतच अपहरण…

6 hours ago

सिडकोतील स्टेट बँक चौक चौपाटी येथे हातगाडीला आग

सिडकोतील स्टेट बँक चौक चौपाटीत (State Bank Chowk Chowpatty) मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास हातगाडीला लागलेली आग…

6 hours ago

नाशिक इगतपुरी तालुक्यात बालविवाह रोखण्यात यश

इगतपुरी तालुक्यात १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह (child marriage) रोखण्यात बाल आयोगाला यश(Success in…

7 hours ago

मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड मार्गावर बस-ट्रकचा भीषण अपघात

मुंबई आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra highway) चांदवड मार्गावर भीषण अपघाताची माहिती समोर आली आहे. अनेक जण…

7 hours ago

उन्हाळ्यात गूळ खाण्याचे फायदे

गुळामध्ये ( jaggery) व्हिटॅमिन बी 12, बी 6, लोह, खनिजे आणि जीवनसत्वे असतात. आपली रोगप्रतिकारक…

8 hours ago

पिंपळगाव येथे महिन्याभरात सुमारे तीन लाख क्विंटल कांद्याची उलाढाल ठप्प

एप्रिल महिन्यात पिंपळगाव बाजार समितीत सुमारे तीन लाख क्विंटल कांद्याचे (onions) आवक होत असते. महिन्याभरापासून…

8 hours ago