टीम लय भारी
मुंबई :- शिवसेनचे युवा नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज आदिवासी समाजाला भेट दिली. आदिवासी बांधवांचे जीवनमान सुधारण्यासाठी व त्यांच्या मूलभूत सोयी सुविधा पूर्ण करण्यासाठी योग्य ते उपाययोजना पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. (Aditya thackeray visited aadivasi people)
आदित्य ठाकरेंनी खावटी अनुदान योजने अंतर्गत जीवनावश्क अन्नधाण्याच्या किटाचे वाटप आदिवासी बांधवांना केले. यासाठी आरे कॉलनीतील खांबाचा पाडा येथे राहणाऱ्या ५२ लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात या वस्तूंचे वाटप केले गेले.
मंत्री यशोमती ठाकूर धावल्या अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी
शिल्पा शेट्टीला दुहेरी चिंता; नवरा तुरुंगात तर नवा चित्रपट अपयशाच्या सावटाखाली
खवटी अनुदान हे एकूण चार हजार रुपयांचे असून त्यात दोन हजार रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू आणि दोन हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याचे सांगितले.खासदार गजानन कीर्तीकर, आमदार रवींद्र वायकर , सुनील प्रभू , जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर , प्रकल्प अधिकारी सुप्रिया चव्हाण इत्यादी मंडळी उपस्थित होती.
मुंबईतील आरेचा ८०८ एकर परिसर जंगल म्हणून घोषित झाल्यामुळे आदिवासी बांधवांना आनंद झाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. खावटी अनुदान वाटप हे आपले कर्तव्यच आहे व येथील आदिवासींच्या विकासासाठी काम करणे गरजेचे आहे असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
राज ठाकरेंचे महाराष्ट्र सैनिकांना आदेश, ‘पुरग्रस्तांना मदत करा’
Maharashtra: BMC To Start IB Board Schools In Future, Says Aditya Thackeray
तसेच नैसर्गिक आपत्तीं पासून बचावासाठी तेथे संरक्षक भिंत बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असे ही ते यावेळी म्हणाले. (These tribes were happy when government announced 808 acres of aarey land as jungle)
आदिवासींनी स्वतःच्या शेतात पिकवलेल्या भाज्या व तारपा वाद्य देऊन आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले.