महाराष्ट्र

Eknath Shinde: मंत्रीमंडळ विस्तारावर मजेशीर कविता !

एक महिना उलटून गेला तरी देखील राज्यात मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंत्रीमंडळ विस्तार लवकरच होईल असे, जनतेला आश्वासन देत आहेत. एका महिन्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेक वेळा दिल्लीला जाऊन आले. एकनाथ शिंदेंनी रात्रीच्या वेळी दिल्लीला जाऊन अमित शहा यांची भेट घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी समारंभाच्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. त्यावेळेस देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची शक्यता आहे, असे असतांना देखील मंत्री मंडळचा विस्तार लांबणीवर पडला आहे. राजकीय पेच प्रसंगाचा तिढा कोर्टात गेला असून, अजून निर्णय लागायचा बाकी आहे. मंत्रीमंडळ विस्तार रखडल्याने अनेक जण खिल्ली उडवत आहेत. अशीच एक मजेशीर कविता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

कविता :
पाळणा काही हलेना…
झाला हनीमून झालं लग्न‍
द‍िल्लीवारीत दोघेही मग्न
दोघांच्याच गुलूगुलू गुजगोष्टी
तरीही काहीच होईना
विस्ताराचा पाळणा काही हलेना….
विस्ताराला मुहूर्त मिळेना
भटजीही झाले सैरभैर त्यांनाही काळी कळेना…
लग्न तर दिले लावून
तरीही सूत जुळेना
चोरुन भेटण्याची
लग्नाआधीची
मज्जा आता येईना….
मध्यस्थ झाली ईडी
घालून कानात बीडी
हाती काही लागेना
वऱ्हाडी झाली खुळी…

कवी:विलास संतराम इंगळे

राज्यात केवळ दोन डोक्यांचे सरकार आहे. राज्याचा गाडा केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हाकत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर विविध प्रकाराने खिल्ली उडवली जात आहे. सोशल मीडियाचा जमाना असतांना देखील अजूनही काही जण कविता करतात. त्यापैकी विलास संतराम इंगळे यांची ही विडंबनात्मक कविता वाचकांच्या पसंतीस उतरली आहे. शिंदे फडणवीस सरकार आले. मात्र पुढच्या हालचाली होत नाहीत. या घटनेला त्यांनी लग्नाचे रुपक दिले आहे.

हे सुद्धा वाचा

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांची उद्धव ठाकरे यांच्यावर आगपाखड !

Ajit Pawar : अजित पवार म्हणाले, राज्यात दोनच ‘टिकोजीराव’, जाणून घ्या कुणाबद्दल…

VIDEO : किरीट सोमय्यांचे पुढचे लक्ष्य अस्लम शेख

राज्यात एका बंडानंतर सत्तांतर झाले. ही घटना महाराष्ट्रासाठी ‘न भूतो न भविष्यती’ अशी आहे. मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस होतील, असे सर्वांना वाटत असतांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. हे बंड घडवून आणण्यासाठी अनेक महिने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे एकमेकांना चोरुन भेटत असल्याचे त्यांनी स्वत: मीडिया समोर सांगितले आहे. त्यामुळे इतके सगळे होऊन मंत्रीमंडळाचा विस्तार का होत नाही ? असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. राज्यात सरकार नाही. तरी देखील राज्याचा गाडा सुरळीत चालला आहे. जनता देखील या दोन डोक्यांच्या सरकारच्या कारनाम्याची मजा चाखत आहे. या घटनेची अनेक प्रकाराने खिल्ली उडवली जात आहे.

रूपाली केळस्कर

Recent Posts

मतदान जनजागृतीसाठी नाशिक मनपातर्फे चित्रकला व मेहंदी स्पर्धेचे आयोजन

नाशिक महापालिका (NMC) व क्रेडाई यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या बुधवारी (दि.8) शहरातील गोल्फ क्लब येथे…

2 hours ago

नो-पार्किंग’मधील वाहनांकडे ‘कानाडोळा’! सोयीनुसार वाहनांची टोईंग

शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये गेल्या आठवडाभरापासून वाहनांच्या टोईंगची (Towing) कारवाई सुरू झालेली आहे. मात्र असे…

3 hours ago

रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढल्या; EVM मशीनची केली पूजा; दाखल झाला गुन्हा

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी ईव्हीएम मशीनची पूजा (worship of EVM…

3 hours ago

राहुल गांधींनी रायबरेलीच का निवडलं?

मै शेरनी हूं और लढना भी जानती हूं, हे वाक्य आहे नुकत्याच झालेल्या रायबरेली(Raebareli) येथील…

3 hours ago

गुणरत्न सदावर्तेंना मोठा धक्का; त्या प्रकरणाचा निकाल आला; बायकोचं पदही गेलं

गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना सहकार खात्याने मोठा धक्का दिला आहे. एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (ST…

4 hours ago

चर बाबत शासनाकडून अद्याप प्रतिसाद नाहीच;पाणी कपातीचे संकट कायम

उन्हाच्या वाढत्या झळांसोबतच नाशिककरांवर पाणी कपातीची ( Water crisis ) टांगती तलवार कायम आहे. त्यातच…

4 hours ago