28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रराजेश टोपेकडे जाणार गृहमंत्रीपद??

राजेश टोपेकडे जाणार गृहमंत्रीपद??

टीम लय भारी

मुंबई :- उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटक प्रकरण, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या बदलीनंतर आता थेट  गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरच टांगती तलवार आहे. अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदावरुन हटवण्याची शक्यता आहे.  अनिल देशमुख यांच्याकडून गृहखात्याचा कारभार काढून घेण्यात आला तर या पदासाठी राष्ट्रवादीतून अजित पवार आणि जयंत पाटील हे स्पर्धेत असल्याचे बोलले जात होते. परंतु आता या पदासाठी राष्ट्रवादीकडून राजेश टोपे यांच्या नावाचा विचार होत असल्याचे समजते आहे.

राजेश टोपे यांच्याकडे सध्या आरोग्य मंत्रिपदाची जबाबदारी आहे. आरोग्यमंत्री म्हणून टोपे यांनी कोरोना काळात केलेल्या कामाचे राज्यभरातून कौतुक करण्यात आले आहे. त्यामुळे गृहखात्यासारख्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारीही त्यांच्याकडेच देण्याचा विचार राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाकडून केला जात असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी राजेश टोपे यांना दिल्लीत ही बोलावून घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी काळात याबाबत नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर सध्या सत्ताधारी महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात नवी दिल्ली इथे महत्त्वपूर्ण बैठक झाली. जवळपास २ तास चालेल्या या बैठकीत पवार यांनी मुंबईतील घडामोडींबाबत गृहमंत्र्यांकडून सविस्तर माहिती घेतली. तसेच पोलीस यंत्रणेकडून झालेल्या कारभाराबाबत शरद पवार यांनी गृहमंत्र्यांना जाब विचारल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सचिन वाझे प्रकरणातून शरद पवार हे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर नारज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीकडून गृहमंत्रिपदासाठी नव्या चेहऱ्याला शोध घेतला जात आहे आणि यासाठी आता शरद पवार पुन्हा आपल्या धक्कातंत्राचा वापर करणार असल्याची ही माहिती समोर येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी