टीम लय भारी
मुंबई: सोमवार दिनांक ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस साजरा केला जातो. या दिवसाचे खास औचित्य साधून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मुंबई विधान भवन येथे खास कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ( Narhari Zirwal, Deputy speaker of assembly, has organised a special program for Tribals, on the occasion of International Tribals Day)
उद्या दुपारी 12 वाजता मुंबई विधान भवन येथे हा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रसरण त्यांच्या सामाजिक माध्यमांवर करण्यात येणार आहे. (governor Bhagat Singh koshyari is the chief guest for this function)
नरहरी झिरवाळ यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय आदिवासी दिवस ९ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. नरहरी झिरवाळ हे आदिवासींसाठी सतत कार्यरत असतात. अनेक सरकारी योजना योजना त्यांनी आदिवासींसाठी सुरू केल्या आहेत. महाराष्ट्राच्या आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारा नेता म्हणून हिरवळ साहेबांची ओळख आहे( Narhari Zirwal is known as a Leader who strives for the overall development of the tribals of Maharashtra).
आदित्य ठाकरेंनी आदिवासींच्या उन्नतीसाठी दिला ‘शब्द
जंगली प्राण्यांची पुजा करणारी ठाणे-पालघरमधील आदिवासी संस्कृती; परदेशी विद्यापीठाकडून होतेय संशोधन
आदिवासी समुदायाच्या अधिकार रक्षणार्थ युनोने 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्याचे घोषित केले. 1993 हे वर्ष जागतिक आदिवासी वर्ष म्हणून जाहीर केले. या काळात आदिवासींचे विविध प्रश्न जगासमोर मांडण्यात आले. 9 ऑगस्ट हा दिवस ठरवण्याचे कारण असे की, ह्या दिवशी, 1982 च्या या तारखेला जिनिव्हा येथे आदिवासी जनतेच्या मानवी हक्कांचे संरक्षण व वाढीसाठी काम करण्याच्या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कार्य गटाची पहिली बैठक झाली होती.
आदिवासी विकास मंत्र्यांनी फसवले! एकाच वेळी तब्बल 45 पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल
Rajasthan: Hindutva’s tribal troubles
आदिवासी समुदायाची संस्कृती, अधिकार, टिकून रहाण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. देशाला स्वातंत्र्य इतकी वर्ष उलटली तरी सुधा आदिवासींची दुरवस्था संपलेली नाही. जगण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गोष्टी देखील त्यांना उपलब्ध होत नाहीत. या लोकांपर्यत ह्या सेवा पोहचाव्या या साठी नरहरी झिरवाळ हे सतत कार्यरत आहेत. आदिवासींचा विकास हेच त्यांच्या कार्याचे ध्येय आहे.